Wednesday 1 December 2021

मला वाचवा


 माझ्या डोक्यात बरेचदा विचार येतो कुठले दिवस असतील जे मी परत जगता यावे म्हणून देवाकडे मागेल?  'back to school ' एकमेव उत्तर.  क्या दिन थे यार ! खरंच शाळेतले दिवस हे फुलपाखरासारखे रंगीत बागडणारे दिवस होते. आणि त्यातल्या त्यात मी खूप अभ्यासू वगैरे च्या संख्येत यायची त्यामुळे आयुष्यातही  टॉप राहूच ही  खात्री होती. जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा लक्षात आले इथे सगळेच काही वेगळे आहे. आतापर्यंत पुस्तकात जी थेअरी वाचली ती इथे लागू होत नाही .इथे फिट बसतील असे फंडे शाळेत शिकवलेच नाही. आणि हा विचार करण्यास भाग पाडले भारतातील गुरुकुल प्रणाली किती बेस्ट होती. जीवनात उदरनिर्वाह होण्याकरिता लागणारे शिक्षण व त्याबरोबरच एक समृद्ध आणि परिपूर्ण व्यक्ती घडवण्याचे मार्गदर्शन इन वन प्याकेज .ऑल अंडर  वन रूफ विथ नो चार्ज.   म्याकेले काका आले आणि सगळ्यात पहिले त्यांनी घाव घातला तो ह्याच प्रणालीवर . भारताचा सर्वांगीण विकास होण्याचे सर्व रस्ते गुरुकुल प्रणाली बंद झाल्यापासून आखूड झाले. अमुक अमुक गुरूकुल’ असा फलक लावून पुराण काळातील गुरूकुल पद्धती पुनरूज्जीवित करता येणार नाही 'द्रोणाचार्य व सांदिपनी यांच्या योग्यतेचे गुरू आज नाहीत आणि कृष्ण-अर्जुन-कर्ण-एकलव्य यांच्या योग्यतेचे विद्यार्थी पण नाहीत . पण काही गोष्टी खरंच पुन्हा आधुनिक पद्धतीने आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमलात आणता येतील.त्यातल्या काही गोष्टींचाच आवर्जून उल्लेख करते आहे.   


१]योग आणि ध्यान -काहीच दिवस झाले आपण योग आणि ध्यान ह्या गोष्टींच्या पुन्हा एकदा जवळ आलोय. ह्याचे कितीतरी फायदे आता लक्षात येत आहे अस सारखं वाटते हे सगळं शाळेत का शिकवल्या गेले नाही जेव्हा आम्ही डेव्हलपमेंट च्या उंबरठयावर होतो.  जगातल्या कॉम्पिटिशन  मध्ये भाग घेणे आणि जिंकणे हे सगळे शाळेने शिकवले पण हरलो तर स्वतःला सांभाळणे आणि पुन्हा उठण्याचे  बळ देणे हे योग आणि ध्यान शिकवून किती लवकर जमले असते.

गिरना और हारना ये बिलकुल  नॉर्मल है  ये पहेलेसे बताया जाता तो आज जिंदगी कूछ  और होती ज्यादा खूबसूरत महसूस होती     

२]उद्योग कौशल्य -मला कोणी लहानपणी जर सांगितले असते की  तुम्ही स्वतःचे उद्योग सुरु करू शकता ,आणि त्याला लागणारे प्राथमिक शिक्षण हे शाळेत मिळाले असते तर , मला जॉब कसा मिळेल हे न बघता दुसर्यांना जॉब कसा देता येईल ही मध्यम वर्गीय मानसिकता नक्कीच  बदलली असती . गुरुकुल मध्ये तेव्हाचे उद्योगासाठी  लागणारे कौशल्य हे लहानपणी शिकवले जायचे पण आता इंग्रजी सिस्टिम प्रमाणे नोकरी मिळवणे हे अल्टिमेट ध्येय आयुष्याचे झाले.आणि स्वतःचे विचार नसलेले लेबर म्हणून मार्केट मध्ये जागा मिळाली . कोणी  १० रुपये देऊन ह्याचे १०० रुपये कसे करता येईल कुठलेही शॉर्ट कट न वापरता  हे सांगितलेच नाही .भाजी विकणे हि ऍक्टिव्हिटी सुद्धा लहानपणी एन्जॉय करायला आवडली असती .    

३]क्रिएटिव्ह learning- नवनीत guide वापरून पेपर मध्ये मार्क्स मिळतात आणि सगळीकडून पाठीवर थाप मिळते हे डोक्यात पक्के बसले होते . म्हणून स्वतःचे डोके लावण्याचे कष्ट घेतले नाही. परंतु नोकरीला लागल्यावर नवनीत गाईड मदतीला नव्हती रोज काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे ह्याची ची डिमांड होत होती . पण आपण स्वतः वेगळे विचार मांडू शकतो आणि ते लोकांना आवडू शकतात हा छोटासा फंडा समजला तेव्हा उशीर झाला होता. आपण कुठलीही टेकनॉलॉजी शिकलो तरी ती काही दिवसांनी जुनी होणार , मग आपण वेगळी  थॉट प्रोसेस जर मुलांना शिकवली तर ...  जे गुरुकुल मध्ये तंतोतंत व्हायचे.  

४]नैतिक विवेक आणि नैतिक प्रशिक्षणाची निर्मिती- cheating करून पुढे जाणारे लोक आजूबाजूला दिसले आणि त्याचे आयुष्यात  काहीही वाईट होत नाही हे कुठेतरी मनाला चटका लावून जायचे . बऱ्याच प्रसंगी राग यायचा ,भावनिक ताबा सुटायचा ह्याबद्दल कोणीच काही शिकवले नाही. physical फिटनेस कडे शाळेत  थोडे फार धडे पी टी च्या पिरियड  मिळाले पण माईंड , इमोशन्स ह्याबद्दल कोणीच शिकवले नाही. आयुष्यातल्या डिप्रेशन वरचे solution कोणी का सांगितले नाही ह्याची खूप खंत वाटते. 

स्वतःची image आणि रेप्युटेशन ह्यावर  जागरूक राहायचे धडे मिळाले  पण सेवा ह्याचे धडे फक्त नैतिक  शिक्षण ह्या  पुस्तकात वाचायला होते. त्याचा प्रॅक्टिकल अनुभव  कधी घेतला नाही त्यामुळे जीवनात सेवा भाव उतरवणे हे प्रचंड कठीण झाले जे गुरुकुल मध्ये सहज  व्हायचे . स्वतःची ,समाजाची आणि देशाची नैतिकता टिकवायला मदत होत होती. 

५]आर्थिक साक्षरता -अक्ख इंजिनीरिंग पूर्ण झाले तरी साधे बँकेचे व्यवहार मला कोणी शिकवले नाही ह्याची खंत होती. पैसा  हातात आला तेव्हा saving आणि खर्च ह्याची बॅलन्स शीट मला maintain ठेवता आली नाही.भारताची आर्थिक व्यवस्था काय आहे ती कुठल्या फ्युएल वर चालते ह्याची विशेष माहिती नव्हती आणि हे माहिती असणे किती आवश्यक होते हे बाहेरच्या जगात आल्यावर कळले . कॉमर्स फील्ड सोडली तर बऱ्याच लोकांना आजही उगाच ह्याचा बाऊ वाटतो  पण हे आधीच  शिकवले गेले असते तर चक्रवाढ व्याज चे फक्त गणित म्हणून सोडवण्याचा दृष्टिकोन बदलला असता . 


एकंदरीत मला वाचवा हे शीर्षक घेऊन  , भारतीय शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धतीचा समावेश आधुनिक पद्धतीने करता येईल का? यासाठी मी हा विषय मांडला. हे प्रत्यक्षात उतरवणे  खूप  अवघड  आहे हे माहित असूनही लेखणीची ताकद खूप आहे ह्यावर विश्वास आहे. म्हणूनच  हा प्रपंच .  

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...