Showing posts with label अध्यात्मातून माझा मी घेतलेला शोध... Show all posts
Showing posts with label अध्यात्मातून माझा मी घेतलेला शोध... Show all posts

Sunday, 10 February 2019

कुठेतरी हरवत चाललेला संवाद

काल  पर्वाची गोष्ट आहे ,निवांत वेळ मिळाला की मुलांना एकत्र करणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडीचा विषय . खूप निरागस उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळतात . त्यांच्या चौकटीतले प्रश्न विचारले तर त्यांना जमतील तसे त्यांच्या त्रिज्या जिथपर्यंत रुंदावू शकतात तेवढे वेगवेगळे आणि सुंदर पैलू असलेले उत्तरे मिळतात. पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघितली  तर  हे कुठेतरी खुंटलंय  याची जाणीव होते . बागेमध्ये सगळा  मुलांचा गोतावळा खेळायला येतो तेव्हा काहीतरी खायला आणावं म्हणून  आई वर्गातल्या बहुतेक बायका इझी टू  कॅरी असं पॅक फूड  आणतात . गप्पा टप्पा च्या खेळामध्ये मी मुलांना विचारलेला सोपा प्रश्न "तुम्हाला माहितेय का लेझ च्या चिप्स कुठून येतात ???"मला ह्या प्रश्नावर खूप विविध प्रकारची उत्तरे येतील किंबहुना चिप्स  शेतातून येऊ शकतात का ??   , इथपर्यंत तरी मुले विचार करतील  अशी किमान अपेक्षा होती . परंतु उत्तरे ज्याप्रमाणे आली ते मला स्वतःला  स्तब्ध करण्यासाठी  कारणीभूत ठरली . लेझ च्या चिप्स ह्या आपल्या सोसायटी समोर असलेल्या दुकानातून येतात . अच्छा मस्त !!!आता मला सांगा त्या दुकानात कुठून येतात ??तर सगळे ओरडली   amzon वरून .वा वा छान च उत्तर आहे !! आणि amazon  ला कुठून   येतात तर लॅपटॉप मधून !! अक्षरशः  कीव करावीशी वाटते मला आजच्या बाल पिढी ची . एवढीच  विचार करण्याची त्रिज्या.  मला आठवतंय लहान असतांना आई हात धरून भाजी मंडई मध्ये घेऊन जायची  भाजी आणणे हा तर फक्त बहाणा होता ,बाहेर  हुंदडायला  मिळेल म्हणून मी ही संधी सोडत नसे.मंडई मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मज्जा यायची ते भाजीवाला आणि आईचा हिंदीत चाललेला संवाद ऐकून . समस्त दूधवाले किंवा भाजीवाले हे भैया लोक असतात अशी माझ्या आईची समजूत आहे . त्यामुळे त्यांच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे असा तिचा गोड   गैरसमज  आहे. भाजी ऐसी शिळी क्यू लग रहि है ??इति माझी आई,"शिळी थोडी ना है बाई ,कूच भी म्हणता तुम्ही "इति भाजीवाली मावशी असा अस्खलित हिंदी मराठी संवाद ऐकायला खूप गंमत यायची ,ओळखीचं कोणी भेटलं कि गप्पा व्हायच्या ,सुख दुःखाची देवाण घेवाण व्हायची . कमीत कमी संवादाचा आस्वाद तरी होता . आता मात्र हा संवादच अपवाद ठरला आहे ह्याच वाईट वाटतं . ऑनलाईन शॉपिंग ने माणसाचं खूप काम हलकं केलय ,बोटाच्या एक क्लिक सरशी पाहिजे ते पाहिजे तिथून तुमच्या दारात पोहचत आहे कमालच नाही का!! अहो पण त्यामध्ये जिवंतपणा नाही ना . कुठे हरवलाय  तो सवांद ??


मुलांची किंवा पालकांची ह्यामध्ये चूक आहे अस अजिबात नाही . पण इझी गो लाईफ झाल्यामुळे भावनांना जागा राहिली नाही. आई बाबांशी गप्पा मारण्यापेक्षा आजच्या  मुलांना एकांत आणि लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त प्रिय आहे.थोडंस थांबून आपणच आपल्या मुलांबद्दल विचार करायला हवा . आपल्या पाल्याला त्याची किंवा तिची स्पेस मिळायलाच हवी पण कमीतकमी नात्यांमधील संवादच संपेल असं होऊ नये  .कुठल्याही  स्पर्धेत मिळालेल्या  बक्षीसाचा  आनंद त्याला फेसबुक वर शेयर करण्याआधी आई वडिलांसोबत साजरा करायाला जमलं तरच नात्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो .


एका १५ वर्षाच्या मुलाला सहज विचारले "तुला मित्र किती रे ?"फेसबुक वर  २०० आणि व्हाट्स अँप वर मित्रांची गिनतीच नाही .तू इतक्या सगळ्या मित्रांना कधी भेटतोस? छे !! मी प्रत्यक्ष खूप जणांना भेटलोच नाहीय अजून. ज्याच्या सोबत मनमोकळं हसता येत ,गळ्यात हात टाकून भटकंती करता येते असा हक्काचा एक तरी मित्र आहे का तुला ?? हो आमचा ४ जणांचा छान  ग्रुप आहे . पण आम्ही व्हाट्स अप वरच जास्त बोलतो ,dp बदलून आपलं लुक आज कसे आहे ते कळवतो ,स्टेटस ठेऊन जगातल्या  प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे हे दर्शवतो  ,अंथरुणातून उठण्याच्या आधीच सगळ्यांना हायफाय ठोकतो ,आणि आमच्या सगळ्या भावना smily वापरून समोरच्यापर्यंत पोहचवतो. हे व्हर्चुअल दिसत असलं ना तरी हेच माझं विश्व आहे आणि हल्ली मी यातच बिझी आहे. अगदी खरंय !!! सगळीकडे हेच दिसतंय ,इथे माणसांची एवढी गर्दी असूनही शांतता आहे . कारण तेच संवाद मुका झालाय .एखादा विनोद सांगितल्यावर कट्ट्यावर जेव्हा मित्रांच्या समुहामधून खळखळण्याचा जो आवाज येतो ,हातावर टाळी देत आनंद साजरा होतो. दुःख ,हास्य ,वेदना,क्रोध ,संताप,प्रेम,आपुलकी ,मिठी ह्या भावनांची सर व्हाट्स अप वरच्या smilies  ला येईल का हो ???एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. नवरदेवासोबत त्याचे ५० कॉलेज गोइंग मित्र होते ,सगळे नाचून एन्जॉय करत होते .एवढे मित्र कसे काय ??हल्ली ५ मित्रही दिसत नाही . तेव्हा कळले कि हे सगळे मित्र म्हणजे नवरदेवाची "ओटा गॅंग" होती ,शाळा सुटल्यावर समोरच असलेल्या ओट्यावर सगळे एकत्र बसायचे आणि तासनतास तिथे घालवायचे ,शाळेमधल्या सरांची केलेली नक्कल असेल,एखाद्या मित्राची टर  उडवणे असेल , क्रिकेटच्या गप्पा असतील, एखाद्याच्या बहिणीच्या लग्नात केलेली कामे  असतील , परीक्षा संबंधी चर्चा असेल अनेक गोष्टी या ओट्याने वाटून घेत ल्या असतील .पण आज हा  ओटा ओस पडलाय ,जो तो हातात मोबाइल घेऊन इथे बसतो,आणि स्वतःच्या दुनियेत मश्गुल असतो . बाजूला हाकेच्या अंतरावर असलेल्या मित्राशी बोलायला वेळ नाही आणि सात समुद्र पलीकडे असेल्या शी व्हाट्स अप वरून चाट होतात . काही दिवसात पैसे देऊन भावना share करायला कोणीतरी विकत घेण्याची  वेळ येऊ नये.

कुठेतरी हरवलेला संवाद ,मला वाटत असलेली खंत आज शब्दांच्या माध्यमातून मोकळी झाली


.  

Thursday, 4 October 2018

चार दिवसांचे गृहिणीत्व .....

written by :Vaibhav Paratwar


तसे तर भारतातल्या जवळपास सगळ्याच धर्मांच्या मान्यतेनुसार स्त्री ने महिन्यातली ४-५ दिवस बाजूला बसून विश्रांती घ्यायची असते. जरी या गोष्टीचे कारण किंवा उद्देश्य पवित्रता असा मानला गेला असला तरी त्यामागे वैज्ञानिक कारणे नक्कीच आहेत. असो, हा विषय याकरिता कि आम्ही पण ठरवलं कि आता महिन्यातले ४ दिवस बायको ला पूर्ण विश्रांती आणि स्वयंपाकघरातून सुट्टी द्यावी.  
आम्ही नुकतेच पर्युषण पर्व साजरा करून पुण्यात पोचलो आणि दुपारी बायको बाजूला बसली. त्या दिवशीचा स्वयंपाक तर झाला होता. पण आता ठरवत होतो कि पुढचे २-३ दिवस काय करायचं? या वेळी नेमकी आई सुद्धा गावाला गेलेली होती आणि मी या आधी पूर्ण स्वयंपाक कधी केला नव्हता. भाजी बारीक करणे, फोडणी घालणे किंवा फार तर फार खिचडी लावणे एवढं केलं होतं. आणि हो भांडी घासण्यात तर आपला हातखंडाच होता त्यामुळे त्याबद्दल काही काळजी करण्यासारखा नव्हता.
आम्ही नवरा बायको तर नुसती खिचडी खाऊन पण राहिलो असतो. पण प्रश्न होता सक्षम चा, आमचे साडेचार वर्षाचे वारसदार! त्याला पोळी/पराठा या शिवाय जमत नाही. मग ठरलं तर. या वेळेस पूर्ण स्वयंपाक मी करायचा. आता प्रश्न होता सकाळी स्वयंपाक करून ऑफिस सुद्धा गाठायचं. तरी माझं भाग्य म्हणावं लागेल कि पुण्यासारख्या शहरात ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे. तरी हे आव्हान स्वीकाराचं ठरवलं.
पहिल्या दिवशीचा अलार्म पहाटे साडेपाच चा लावलेला पण नेहमी प्रमाणे अलार्म बंद करून पडून राहिलो तो उठलो एकदम साडेसहा ला. उठून स्नानादि प्रातःविधी उरकून स्वयंपाक घरात शिरलो. पहिले पाणी गाळून घेतले आणि मग ठरवलं अगोदर आपण जे जमतं ते उरकून घ्यावं. पहिले अंदाजे तांदूळ, डाळ काढली नि कुकर लावला, थोडा अतिविश्वास दाखवला स्वतःवर, कारण बऱ्याच दिवसांनी वरण भात लावणार होतो. तरी नशिबाने साथ दिली आणि वरणभात बऱ्यापैकी जमला. 

भाजी हा एक प्रकार मला जमण्यासारखा होता, तेव्हा सोपी म्हणून दोडक्याची भाजी केली. आणि मात्र आता होता मोठा प्रश्न तो म्हणजे पोळ्यांचा. कणिक मळण्या पासून शिकायचं होतं. त्यासाठी मला मदत हवी होती, कुणीतरी सांगण्याची. बायकोला उठवणं भाग पडलं. किती पीठ घ्यायचं, पाणी कसं टाकायचं, किती टाकायचं,  तेल केव्हा आणि किती लावायचं असं सगळं तिने व्यवस्थित सांगितलं. तरी थोडं पाणी जास्तच झालं. तेव्हा थोडी अजून कणिक घेऊन तेल लावलं आणि एकदाचा आमचा कणकेचा गोळा तयार झाला. 

माझी हि अवस्था पाहून बायको ने फलक्यांपेक्षा पराठे करण्याचे सुचवले आणि मलाही ते पटलं. तिला तिथेच supervision साठी उभं केलं आणि मी पराठे लाटायला सुरुवात केली. आकार तर कधी महाराष्ट्राचा तर कधी श्रीलंकेचा येत होता पण नाईलाज होता. काळजी फक्त एवढी घ्यायची होती कि कडांना कच्च राहू नये. पराठे कशे भाजायचे, किती तेल लावायचं, कधी पालटायचे अस सगळं बायको सांगत गेली. एक दोन पराठे वगळता बाकीचे खाण्यालायक झाले होते असा शेरा खुद्द राणी सरकार कडून मिळाला! केलेल्या श्रमाचं फळ मिळालं असं वाटलं. पण खरी परीक्षा तर होती ती सक्षम ने जेवण करण्याची आणि त्याला आवडण्याची. त्यातही मी कसाबसा पास झालो :). 

त्यादिवशी डोक्यात विचार आला, ज्या गृहिणी नौकरी किंवा व्यवसाय करून आपल्या घरच्यांसाठी सगळा स्वयंपाक करत असतील त्यांची सकाळी सकाळी किती धावपळ आणि श्रम होत असतील? आणि आपल्या पूर्वजांनी जी हि ४ दिवस स्त्री ने बाजूला बसण्याची आणि संपूर्ण विश्रंती घेण्याची जी प्रथा आहे ती पण किती योग्य आहे ते कळलं.  पुरुषांना सुद्धा ४ दिवस आपली पाककला जिवंत ठेवायला आणि नवीन काही शिकायला मिळतं. तेव्हा सर्व पुरुषांनी महिन्यातून ४ दिवस तरी गृहिणीत्व स्वीकारावं आणि त्यातला आनंद घ्यावा!

Monday, 4 June 2018

डिजिटल इंडिया चल पड़ा है ......आज भारत को सवारने


कल सुबह जल्दी उठकर गैलरी में आकर ठंडी हवा खाने का मन हुआ, बहुत व्यस्तता के कारण ये मौका बहुत ही कम मिलता है|  अंगड़ाइयां लेते ही निचे देखा तो सफ़ेद रंग का टी-शर्ट पहने हुए लड़के लड़कियों की टीम रास्ता साफ़ कर रही है| देखकर आश्चर्य लगा ....और मन में एक कमीसी भी लगी की यहाँ अंगड़ाईयाँ न लेकर मुझे भी निचे होना चाहिए था|  सैटरडे की छुट्टी को नींद में न गवाँते हुए ये लोग आज एक बहुत महत्वपूर्ण काम करने आये थे| बात बहुत अच्छी है की भारत बदल रहा है| आज की युवा पीढ़ी को अहसास हो रहा है की शुरुवात हमें हमसे ही, अपने घर से ही करनी है| 

देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है,
युवाओ के हाथो से ये भारत संवर रहा है,
मेरा देश, मेरा देश, मेरा देश.... 
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !

तीन साल पहले, प्रधान मंत्री नरेन्द्र मोदीजी ने एक मिशन का शुभारंभ किया था|  और आज की युवा पीढ़ी इसमें उतर आयी है ये बहुत गौरव की बात है| हमारे  पहले की पीढ़ी कहती है की आज कल के युवा लोग, न संस्कार जानते है नाहीं आत्मीयता, इनको तो बस डिजिटल साधनो से प्यार है|  ये पूरी तरह सच नहीं है, डिजिटल होने के साथ साथ एक जागरूकता भी इस पीढ़ीमें दिखाई देती है| 

ये लिखने का प्रयोजन यही है की, सिटी बैंक की तरफ से खराड़ी स्वछता अभियान का उपक्रम IT के युवाओ दवरा करवाया गया|   सबको सिटी बैंक की तरफ से सफ़ेद टी शर्ट दी गयी और ये युवक युवतियां निकल पड़े इंडिया को स्व्च्छ बनाने, अपने सेल्फी फोटो और व्हाटस एप के स्टेटस को अपडेट करते हुए, सफाई जारी थी|  लगातार ३ घंटे ये सब लोग जोश के साथ काम कर रहे थे|  जो उंगलिया कंप्यूटर पर तेजीसे चलती है वही उंगलिया आज क्यारी बैग्स की गन्दगी उठा रही थी|  और सही अर्थो में डिजिटल इंडिया आज रस्ते पर उतरकर ग्रांट रोड पर फैली हुई अनवांटेड फाइल्स रीसायकल बिन में डाल रहे थे| बस धीरे धीरे ये डिजिटल इंडिया अगर ठान ले तो भारत को फिरसे सुनहरा बना सकता है|

   जानते हैं कि सफाई एक दिन का काम नहीं है. सफाई जब तक आदत का हिस्सा नहीं बन जाती तब तक गंदगी वापस लौटती रहेगी. स्वच्छता अभियान यदि एक बार सफल भी हो गया, तो भी देश में स्वच्छता टिकी नहीं रह पाएगी जब तक  सफाई हमारे निजी और सार्वजनिक जीवन का अभिन्न अंग नहीं बन जाती.हम अपने आप से कमसे कम ये तो उम्मीद रखे की खुद सफाई न कर पाते तो न सही पर कमसे कम जो करते है उनकी मदत   तो करे ,ये भी नहीं कर सकते तो कम से कम  उनको प्रोत्साहित करे और ये भी नहीं हो सकते तो कृपया अपने घर की गन्दगी बहार रस्ते पर न डाले

Friday, 6 April 2018

बऱ्याच दिवसांनी सहजच !!

सक्षम ला घडवतांना मला काय वेगळा अनुभव येतोय हे आज मी शब्द रूपाने उतरवण्याचा प्रयत्न करते आहे . जगापेक्षा वेगळी वाट निवडलीय खरी ,चालायला आम्ही सज्ज पण आहोत पण हि वाट नेमकी कुठे पोहचवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पण छान  वाटतोय हा प्रवास ... तुम्ही कधी केलय असं ? ध्येय किती दूर आहे ,कुठे थांबायचं हे माहित नसताना चालत राहणे.करून पहा मज्जा येईल आयुष्यात. आमच्याबाबतीत हेच होतंय . आजूबाजूचा आई हा वर्ग मुलांना सकाळी उठवणे  , दप्तर तयार करणे,डब्बा भरणे,स्कूल बस पर्यंत जाऊन टाटा करून येणे , दुपारी बस ची वाट बघणे , होम वर्क करून घेणे किंवा स्वतःच करणे.......  डब्बा संपवला नाही म्हणून ओरडाओरडी ,वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवणे ... हुश्श !! ह्यामध्ये धावतांना दिसतात  .पण माझ्याबतीत हे काहीच घडत नाहीय . कारण स्कूल ह्या विषयापासून मी आणि सक्षम खूप दूर आहोत. आमचा दिवस तो उठेल तेव्हा चालू होतो . सकाळी लवकरच उठाव असा माझा आग्रह नाही. पण तो त्याची झोप पूर्ण करून वेळेतच उठतो. सकाळची थंड हवा अंगावर घेऊन मोकळ्या मैदानात चक्कर मारून प्रसन्न सूर्योदय बघत बघत आमच्या  अखंड उत्साहपूर्ण दिवसाची सुरवात होते. निसर्गाच्या शाळेपुढे मला बाकडे टाकलेली चार भिंतीची बंद शाळा ठेंगणी वाटते. आणि विशेष म्हणजे आम्ही एका शाळेसमोरूनच हिंडत फिरत जात असतो. माझ्या घराच्या बालकनीतून थोडं दूर बघितलं कि शाळेचं तेच तेच चित्र रोज दिसत. ठराविक वेळेला वातानुकूलित ,उत्तम दर्जा असलेल्या बसेस गेटसमोर येऊन थांबतात , सगळी मुले रांगेत उतरून आपापल्या वर्गामध्ये प्रवेश करतात,आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ६ तास घड्याळीच्या ठोक्याप्रमाणे यंत्रवत चालू असतात , त्या शाळेमध्ये प्रत्येक स्पोर्ट्स साठी क्लब हाऊस  आहे. एकदम  उत्तम !!!यामध्ये वादच नाही आणि का असू नये पालकांकडून घेतल्या गेलेल्या फीसमधून एवढं समृद्ध ठेवणं आवश्यक आहे.पण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन ,स्विमिन्ग पूल मध्ये नुकताच हात पाय मारायला शिकलेला तो छोटा मुलगा ,अजून आनंद घ्यावा असं वाटलं तरीही घड्याळात ठोका वाजतो ,कारण त्याला संगीतावर ठेका धरायला जायचं असत. ह्याच शाळेमध्ये संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त इतर मुलांसाठी स्विमिन्ग पूल ओपन असतो , सक्षम आणि माझी हझरी तेव्हा तिथे लागते. आणि  हा माझा  स्वतःचा अनुभव आहे स्वच्छंद सोडल्यानंतर त्याची प्रगती लवकर होते आहे. अक्षरांच्या ओळख बाबतीतही बोलायचं झालं तर  ,जी मुले वयाच्या ५ वर्षी वाचायला शिकतात माझा मुलगा कदाचित उशिरा शिकेल  ह्याच दुःख अजिबात नाही पण तो स्वतः धडपड करत शिकेल ,अनुभवातून त्याच तो शिकेल ,ह्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं काही नाही .मी फक्त त्याच्यासाठी एक माध्यम आहे.  १२ वय वर्षी वाचायला शिकलेला एक मुलगा वयाच्या १४ वय वर्षी एका मासिकाचा  संपादक म्हणून काम करू शकतो,असेहि  कुठेतरी वाचनात आलय.नैसर्गिकपणे शिक्षण हे केव्हाही उत्तम .  माझी कुठल्याही शाळेवर टीका नाही ,आपल्या मुलाला शाळेत टाकावं किंवा टाकू नये  असा माझा कोणाला आग्रहही  नाही. हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे . सगळेच जण प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतात असही नाही. फक्त एका मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेल्या आईच्या चष्म्यातून स्कूल ते होमस्कूल  आणि या गोष्टीकडे कसं  बघावं हाच दृष्टिकोन ठेऊन मी लिहत आहे. 
मी स्वतः कॉलेजमध्ये जेव्हा ठराविक तासाला ठराविक शिकवायचं असा ठोकताळा स्वतःशी बांधून जाते तेव्हाच lecture आणि स्वछंद ,ठरवून न घेतलेलं lecture ह्यामध्ये खूप अंतर मला जाणवते. चौकट  आखून घेतली कि काही गोष्टींना सीमा राहते  . अभिव्यक्ती  स्वतंत्र हाच मुळात शिक्षणाचा पाया  आहे. आपण काय शिकतोय ह्यापेक्षा कस शिकतोय हे खूप महत्वाचं आहे. शिकण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम वर  अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्याला क्षितिज च शिकण्यासाठी अंत असू शकतो . कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होणं किंवा एखादी  डिग्री मिळवणं हे समाधानी आयुष्य जगण्यासाठी कारण असू शकत नाही. शिक्षणातली उच्च पदवी मिळवण्याकरिता मी सध्या संशोधन करतेय ,पण   मला प्रासंगिक उद्भवलेल्या प्रश्नावर तोडगा काढता येईल का ???हा मला बरेचदा पडलेला प्रश आणि त्यावर न सुचलेलं उत्तर !!!! बालपण म्हणजे एक निरागस जगणं आहे. ध्येय गाठण्यासाठी त्याला स्पर्धेच्या शृंखलेत न अडकवता तिथपर्यंत जात असलेली वाट ,प्रवास अनुभवता यावा . हि प्रामाणिक इच्छा . किती सुंदर असेल तो प्रवास जेव्हा  मुक्कामच असेल तुमचा खरा प्रवास !!!


Monday, 19 February 2018

चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे

अनुभवी प्रधानमंत्री  आधीच घरी असतांना नवीन येणाऱ्या गृहमंत्र्यांचे स्वागत आनंद आणि दुःख अशा  सरमिसळ भावनांनीच होत असतं . "सुनबाई आलीय आता तुम्ही मोकळ्या व्हा "मैत्रिणींनी दिलेला टोला ,हसून टोलवावा कि झेलावा हेच कळत नाही . मोकळे व्हा पण नेमके कोणत्या कोणत्या प्रकरणातून ?हे मात्र  ठरत नाही . मुलगा शिकून मोठा झाला चांगल्या उच्च पदावर नोकरी सुद्धा आहे. भरभक्कम कमावतो ,आणि आईच्या शब्दाबाहेर नाही हं ,बापरे केवढं ते सुख सासूबाई या समस्त वर्गाला  .आयुष्याची शर्यंत जिंकलेच समजावं ह्या घडीला. मग काय तोऱ्यात शोध सुरु होतो तो सुनबाईंचा ,प्रत्येक सार्वजनिक प्रसंगाला हळदी कुंकापासून ते दूरच्या नात्यातल्या लग्नापर्यंत हजेरी लावणे सुरु होते.आधीच जाड काच असलेल्या चष्म्यातून योग्य ती मुलगी टिपण्याचा कार्यक्रम कोपऱ्यात बसून चालू असतो, आणि न जाणे लग्नात अशा किती समस्त भावी सासूबाई बसल्यात हे ओळखूनच सगळ्या मुली वावरत असतात. कमाल आहे नाही!!सुंदर नटून थटून ,चेहऱयावर जमेल तेवढं स्मित ठेऊन ह्या भावी सुना बागडत असतात . त्या जाड काचातुन  नजर बरोबर कोणावर तरी खिळून जाते ... ... आणि मग काय विचारपूस चालू. तिच्या घरी जाऊन  केवळ लोकांनाच नाही तर घरातील वस्तू बारकाव्याने बघितलेल्या असतात  आणि कुठल्या गोष्टी रीतील सोडून आहे आणि कुठल्या धरून हे अचूक  टिपलेलं असतं  . आपल्या साच्यात बसणारी निघाली तर सोन्याहून पिवळं नाहीतर शोध अभि जारी है !!!!

   बऱ्याच मुलींना नाकारून एक पसंत केली जाते .  सोनारयाच्या दुकानात जाऊन संपूर्ण दागिने बघून सुद्धा मनासारखं नाहीच मिळालं असा म्हणून एकाचा स्वीकार होतो अगदी त्याचप्रमाणे,पुढची अवघड असणारी पण समर्थपणे पेलणारी क्रिया म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नसणाऱ्या मुलाला शब्दात अडकवणे. तिच्याबद्दल ऐकलेलं ,न ऐकलेलं उत्तमच सगळ्यांना ऐकवणे.आणि आपली आई आपल्यासाठी योग्यच करत आहे असा म्हणून मुलाने दिलेला होकार  म्हणजे संस्काराची पावतीच !!!!अशाप्रकारे घरातील प्रधानमंत्री खरंच  प्रधान बनून सगळं पार पडतात. आणि सासूच्या भूमिकेत शिरतात . मनात मात्र धाकधूक कायम असते ,एक अनोळखी चेहरा ,अनोळखी घराणं  आपल्या काळजाच्या तुकड्याशी कायमच  जोडणं . आणि आपल्या भविष्याची मदार काहीप्रमाणात त्या मुलीच्या खांद्यावर टाकणं ."आजकालच्या या नवीन मुलींचं आपल्या सारख्या सासवांसोबत जमणं  सोपं नसत. त्यांचं शिक्षण,त्यांचं स्वतंत्र ,त्यांची कमाई मोठी मोठी होत चालीय ना " महिला मंडळाच्या एका सूनग्रसित सासूचा टोला आठवतो. आणि आपल्या वाट्याला आलेला वाण हा उत्तमच असेल आणि नसला तरी जे बाकी जगाच होत तेच आपल्यासोबतही होईल अशी  अशी शंका वजा  समजूत काढून पुढला प्रवास ठरतो. हे झालं सासूबाईंच्या मर्जीप्रमाणे ठरलेल्या  लग्नाबद्दल . पण जे लग्न नवरा मुलाच्या पसंतीप्रमाणे ठरतं त्यातही सासूबाई ह्या नटाची कहाणी वेगळी नसते. 

आधीची गोष्ट वेगळी होती लग्नामुळे एक मुलगी अख्या कुटुंबाशी जोडल्या जायची .कितीही आवडो किंवा न आवडो जन्मभर ते ओझं वाहायची पण आता मात्र लग्न दोन व्यक्तीच होत आणि निम्या लोकांना तेही धड सांभाळणं अवघड जात . मुलाने पसंत केलेली मुलगी पदरी पाडून घेणं तिचा स्वीकार करणं हे पण एका दिव्यातून जाण्यासारखंच आहे. आपल्या सुनेला काय निक्षून सांगायचं ,काय बजावायाच ,काय मनावर ठसवायचं  याची यादी सासूबाई मनात घोळवत असतात. मुली सासरी जातात तेव्हा तिची आई अस्वस्थ होतेच पण सून येणार म्हणून मुलाची आई देखील अस्वस्थच असते. शेवटी काय "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे " . 


सध्या माझी भूमिका सुनेची आहे. सुनेबद्दल नंतर कधीतरी !!!

Thursday, 2 November 2017

माझी आजी ......... एक ठसठशीत व्यक्तिमत्व


आमची आजी म्हणजे शांताबाई ओंकारदास चवरे . माझ्या आईची आई . माझं बालपण आजीच्याच संगतीत गेलं म्हणून तीच व्यक्तिमत्व फार जवळून बघायला मिळालं. आजी म्हणजे  वडाच्या खोडासारखी मजबूत बुंधा असलेली आहे .तिच्या सावलीत आम्ही सगळे भावंडं मोठी झालो. तिची मुले मुली म्हणजे वडाच्या झाडाला असलेल्या पारंब्याप्रमाणे  आहे . ५मुली २ मुले एवढा मोठा पसारा या वडाच्या झाडाचा आहे .आजीने आयुष्यात बरच काही पहिल. नातवंडाची मुलं बघायला मिळालेली माझी आजी वयाच्या ८७ वर्षी देखील ठणठणीत आहे. एक प्रकारचा प्रचंड शहाणेपणा आणि समजूतदारपणा तिच्याकडे होता. खूप भयंकर अनुभव तिच्या समोर आले पण आजीने कधीच मान टाकली नाही . हे तीच जगण्यावरच प्रेम होत की  जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे लक्षात आल नाही पण आजोबा असूनही त्यांची पाहिजे तशी साथ आजीला संसाराचा गाडा ओढताना मिळाली नाही. सगळा गाडा तिने एकटीनेच ओढला,आपण जर काही केलं नाही तर मुले रस्त्यावर येतील हे जाणून तिने जगायचं थांबवलं नाही किंवा कोणी मदतीला येईल याची वाट पहिली नाही. पदर खोचून कमी वयात कर्तबगार झाली. आजच्या काळातलं वातावरण जर आजीला मिळालं असत तर ती कुठल्या कुठे गेली असती. पण तिची ही मेहनत मात्र मुलांना उभी करण्यात दिसली. 
आजीचं मुळच माहेर  अचलपूर अमरावती जिल्ह्यातील , भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हाचा  तिचा जन्म ,घरातील परिस्थितीमुळे आजीला कारंजा येथील कंकूबाई आश्रमात शिकायला ठेवले. आजीचं शिक्षण १० वि पर्यंत झालं . लगेच आजीला जिल्हा परिषदच्या शाळेत नोकरी मिळाली होती . तीच व्यक्तीमत्व देखील शिक्षिका म्हणून शोभून दिसत होत . आजी  दिसायला विलक्षण तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यवरच तेज आजही अंगावर आलेल्या सुरकुत्या मधून  झळकत. आजोबानी आजीला पाहताच क्षणी पसंत केलं होत हे आजोबांकडूनच ऐकलेलं आठवत . एका ठराविक लयीमध्ये आजोबा आजीला "मास्तरीण बाई SSSSS " म्हणून हाक मारायचे. आजी कायम नऊवारीत दिसायची आता मात्र अघळ पघळ गाऊन घालते पण कोणी बाहेरचे लोकं  आले कि तिची पदर सावरण्यासाठी घालमेल होते.
अंघोळ करून झाली की  तीच वेणी फणी करून लांबसडक केसांचा रिबन लावून अंबाडा पाडणं  ,आणि कपाळावर ठसठशीत कुंकू अजूनही स्मरणात आहे. आता मात्र कुंकूंची जागा टिकलीने घेतली तेवढाच काय फरक बाकी अजूनही सगळं जसच्या तस. तिची एक संदूक होती लोखंडाची त्याला कायम कुलूप  असायचं,त्याची चाबी तिच्या गळ्यात एका काळ्या दोराला अडकवलेली असायची ,आम्हा भावंडाना कायम उत्सुकता असायची कि यामध्ये काय बर असेल?एकदा पेटी उघडायचा मला मौका मिळाला तिच्या हिशेबाच्या वह्या,पेन्सिल,रब्बर,गळ्यातील पोत ,एका वहीमध्ये पैसे अस बरच काय काय कामाचं आणि बिनकामाच सगळंच असायचं . हि सवय तिला आश्रमात असल्यापासून  होती . आजोबा पंडित होते ते कायम फिरस्तीवर असायचे . त्यामुळे सगळंच आजीला करावं लागायचं.तिची खूप ओढाताण व्हायची . ज़िल्हा परिषद ची नोकरी असल्यामुळे तिच्या सारख्या बदल्या व्हायच्या ,नवीन ठिकाणी घडी बसायला वेळ लागत होता . पण तिने सगळंच धीराने केलं . समाजात मिसळणं , लग्नाला जाणे,आला गेला पै पाहून बघणे यामध्ये तिला खूप उल्हास नव्हता . परिस्थिती पण तशी नव्हती. सगळ्यात  पहिली गरज तिला मुलांचे पालनपोषण करणे ही होती .  नोकरीमध्ये पण आजी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली , तिचा शाळेमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये आणि घरीही धाक होता. आम्ही नातवंड सुद्धा आजीच्या एका आवाजात गपगार व्हायचो . आजोबा सुद्धा आजीचा आवाज वाढला कि शांत बसलेले मी पाहिलंय . नशीब ,प्राक्तन,देव हे शब्द मी कधी आजीच्या तोंडून ऐकले नाही. फार देव देव करणं तिला आवडायचं नाही ,तिचा विश्वास आपल्या पुरुषार्थावर आहे.चांगले वागणे म्हणजेच देवाची पूजा आहे असा ती म्हणायची , दणकून कष्ट करावे ,ह्यावर तिचा विश्वास आहे. तिच्या नातवंडांना परीक्षेत कितीही मार्क पडू देत ती आवर्जून पेढे आणायला लावायची . आजीची पेंशन काढायला मी रिक्षात तिला घेऊन जात असे . तिकडून येताना मला नेहमी खाऊ मिळायचा ,आता आजीचं वय झालाय ,तिची स्मरणशक्ती खूप कमी झालीय पण मधेच तिला जुन्या गोष्टी आठवतात . माझी मोठी मावशी म्हणजे तिची मोठी मुलगी आणि जावई दोघेही आता या जगात नाही ,पण शरयू कडे जायचं असे ती  बरेचदा म्हणते. आम्ही सगळे नातवंड जमलो कि तिला आनंद होतो ,आम्ही तिथेच राहावं असा तिला कायम वाटत ,माझं लग्न झालाय हे सुद्धा ती बरेचदा  विसरते. एक मजेशीर प्रसंग मला आठवतो, आईच्या दूरच्या नात्यातला एक व्यक्ती एकदा घरी आला होता,त्याचे चारित्र्य  तरुण असताना चांगले नव्हते (आजीच्या भाषेत लंपट ) पण साधारण त्याचे वय ४२ वगैरे असेल तेव्हा तो घरी भेटायला आला होता . पण आजीच्या डोक्यात अजूनही जुन्या आठवणी असतील त्याच्याबद्दलच्या , आईला आजीने त्याला बाहेर काढ म्हणून सांगितले,पण एक्दम कोणाला जा म्हणून कस  सांगणार म्हणून आई विचार करत होती , आई बाहेर काढत नाहीय म्हणून आजी तिची काठी टेकवत बाहेर आली ,आणि त्या बिचाऱ्या व्यक्तीला घालून पडून बोलून हाकलून लावलं . आता तो तसा नसेलही पण आजीच्या   जुन्या आठवणीतुन तो विसरल्या गेला नव्हता . आम्हाला मात्र तोंड लपवायला जागा नव्हती. आजीचा एक भाऊ न चुकता भाऊबीजेला ओवाळायला  येतो,तेव्हा आजीच्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या मी पाहिलंय . ,तिच्या या आग्रही स्वभावानं माझे मामा ,आई,मावशी सगळ्या उच्च  पदावर नोकरी करू शकत आहे,तेव्हा जर आजीने मूलं  आणि मुलींना  बाहेर पडू दिल नसत तर आज त्यांनी इतकी प्रगती केली नसती. समाजात अंधश्रद्धा असताना  देखील आजीचे विचार बुरसटलेले नव्हते. तिने यासाठी बऱ्याच लोकांचा वाईटपणा ओढवून घेतलाय. .कसलं आणि कुठून आलेलं शहाणपण तिच्याकडे होत ठाऊक नाही पण कोणी आजीचं ऐकलं नाही असा कधी झालं नाही . 
आजोबा गेल्यानंतर देखील तिने स्वतःला सावरलं. आज तीच शरीर कृश झालाय,असंख्य सुरकुत्यांनी व्यापलाय ,पण स्वतःच स्वावलंबीपण मात्र अजूनही तसाच आहे. तिच्या भिंगाच्या चष्म्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अजूनही मोहवून टाकतो . म्हणून आजीवर लिहण्याचा माझा हा प्रयास!!!  
  




Tuesday, 19 September 2017

कहानी वाला गांव आज बिना खोजे ही मिल गया


पर्युषण पर्व जैन लोगोंका सबसे महत्वपूर्ण पर्व कहलाता है. ये आत्माकी शुद्धि का पर्व है.  इन दिनों में सिर्फ मानव ही नहीं प्रकृति  भी बहोत खुश होकर झूमने लगती है . हम शहरी लोगों के लिए ये पर्व तो कुछ खास मायने रखता है. हम अपने भोगविलास में इतने रचपच गए है की ये पर्युषण पर्व, एक मौका है हमारे असली रूप को पहचानने का, अपनी आत्मा की और देखने का. इसीलिए हम प्रयास करते है के पर्युषण, निर्ग्रन्थ गुरुओं के सान्निध्य में हो और वह भी ऐसे गुरु जो पंचमकाल में भी चतुर्थकाल जैसी चर्या और साधना में लीन हो - परम पूज्य १०८ श्री विनीत सागरजी एवं परम पूज्य १०८ श्री चन्द्रप्रभ सागरजी।

इस बार के चौमासे में वे मुनिराज राजस्थान प्रांत के बोराव नामक एक छोटेसे गांव में विराजमान हैं. हमारा तय था के महाराजजी जहाँ होंगे वहा जाना है, यहाँ पुणे से हर चौमासे में करीब १५-२० लोग चौका लेकर जाते हैं, उनके साथ हम भी निकल पड़े. अनजान इस बात से के एक ऐसा अनुभव साथ लाएंगे जिसे शायद जिंदगी भर भुला नहीं पाएंगे.

बहुत बार ये सोचते थे की आदर्श जीवन कैसा होना चाहिए ,"एक गांव है जहा सब लोक मिलजुल के रहते है , गांव में एक नदी है आजुबाजु खेत है ,खेत का पका हुआ अनाज घर में आता है जो की रसायनो से परे है, घर में भी  बड़ो का आदर होता है, सुबह शाम भगवान की भक्ति होती है, जहा अपनी धर्म और संस्कृति बहुत नजदीक से देखने को मिलती है " ये सब अब तक कहानी में सुना था. लेकिन अपने कानों पर और अपने आखों पर विश्वास न बैठे ऐसी जगह का पता वर्तमान में पता चला है उस गांव का नाम है "बोराव". 

गूगल मैप पे ढूंढोगे तो दीखेगा नहीं, क्यूंकि शायद देवों के द्वारा बसाया गया हो ऐसा लगे और शायद शहर वाले लोग यहाँ जाके गन्दगी न फैलाये इसीलिए दीखता नहीं हो. हम भी ऐसा ही सोच के  गए थे पता नहीं कहा जा रहे है ? इतना छोटा गांव पर्युषण की व्यवस्था होगी भी की नहीं ?  इतना बस पता था की परमपूज्य श्री १०८ विनित सागर जी और परमपूज्य श्री १०८ चन्द्रप्रभु सागर जी महाराजी का सानिध्य मिल जाये तो पर्युषण सफल हो जाये. लेकिन मन में थोडीसी आशंका थी. हमारा कुछ ऐसा हुआ पुणे से नागदा जंकशन सुबह ६:०० बजे पहुंचे और वहां से कोटा करीब ११ बजे पहुँच गए. कोटा में एक करीबी रिश्तेदार के यहाँ नाह धोके, भोजन किया और  दोपहर २ बजे गाड़ी मिलेगी ऐसा सोच कर धुप में २ घंटे इंतजार करते रहे लेकिन गाड़ी तो दूर कोई साधन नहीं मिला. रावतभाटा होके सिंघौली की गाड़ी पकड़ली और २ गाड़िया बदलते हुए बोराव पहुंच गये. हम शहरी लोगों को सब इंस्टेंट मिलता है इसीलिए संयम जल्दी छूटता है. और शाम को ६ बजे बोराव पहुंच गए. कहा आके पड़ गए ये सोच बनी हुई थी. लेकिन ये असली जन्नत है ये बादमे पता चला. लेनेके लिए लोग पहले ही पहुंच चुके थे. शाम की भोजन की व्यवस्था बन चुकी थी. महाराज जी के दर्शन के बाद मन थोड़ा हल्का हुआ. हमारा सामान दो बुज़ुर्ग लोगों ने (कोई कर्मचारी नहीं बल्कि श्रावक थे वहां के ) उठा के सही जगह पंहुचा दिया और हमें पता भी नहीं चलने दिया. मेरी चप्पल भी जब उठा के पंहुचा दियी तब हम शहरी लोगों का मान मिट्टीमे मिल गया. आज तक यही समझा था हम जैसी व्यवस्था छोटे गांव वाले नहीं कर सकते है पर ये तो शुरूवात थी. 

हम करीब १६ लोग पुणे से चौका लेके गए थे. और इतने लोगोंकी व्यवस्था कोई अपने घर पे एक नहीं दो नहीं पुरे दस दिन कर रहा है और वो भी कोई हिचकिचाहट न रखते हुए ! हम लोग दस बार सोचेंगे?? कही अपना घर ख़राब न कर दे !! बहुत छोटी मानसिकता है बड़े बड़े शहरवालों की !!!


ऊपर के नए दो कमरे हमारे रहने के लिए और बड़ा हॉल चौका के लिए दिया था . बर्तन तो उनके खुद के घरके थे . जितने बड़े बड़े थे सब हम लोगों केँ लिए दे दिए, बिना गिने ही. अपने परिवार वालों को गिनके बर्तन देने वाले हम उनके लिए तो अनजान लोग ही थे. हमने जो द्रव्य (गेहूं, दाल, इत्यादि ) लाया था वो वैसा के वैसा रखना पड़ा, खेत के गेहू, सब्जी, फल सबकी तैयारी कर के दी थी. यहाँ तक की दूध  भी अपनेही घर का और खुद घर की महिलाओं ने निकला हुआ. यहाँ की महिलाये, पुरुष, बेटियां और बहुएँ घर का सारा काम (झाड़ू पोंछा, बर्तन मांझना, बोझा ढोना) खुद ही करते है. इन कामों के लिए इनके यहाँ कोई सेवक नहीं आते. जिससे इनका स्वावलम्बन अभीभी टिका हुआ है.  


"अतिथि देवो  भव " क्या और कैसे होता है ये  वहां जाकर पता चला. अपनी संस्कृति और धर्म को इन लोगोने बड़ी अच्छी तरह बचाके रखा है. महिलाओ की मर्यादा और पुरुषोंकी सादगी को यहाँ जतन करके रखा है. इस गांव की एक और ख़ासियत ये है की, इस भौतिकतावादी युग में भी यहाँ की बेटियों के पास अपना खुद का मोबाइल नहीं है. उन्हें जबभी कोई जरुरत होती है तो अपने पिता या भैया का मोबाइल इस्तेमाल करती हैं और तुरंत लौटा देती है. छोटे बच्चों से लेकर बुजुर्ग तक सभी लोग अभिषेक, पूजा एवम स्वाध्याय में दिखाई देते है. मंदिरजी में सुबह की संगीतमयी पूजन के लिए, या संध्या की भक्ति के लिए किसी बाहर के संगीतकार की कोई आवश्यकता ही नहीं. यहाँ कोई भाई गाता है तो कोई ढ़ोल बजाता है और कोई अपनी उँगलियों का जादू पियानो पर चलता है. महाराजजी के आहार के बाद ढ़ोल, ताशे और बाजे की जयजयकार में महाराजजी का मंदिरजी तक विहार कराने वाले भी छोटे छोटे श्रावक। ऐसा लगता था के जैसे चतुर्थ काल के मुनियों को चतुर्थ काल का ही भारत और चतुर्थ काल के ही श्रावक मिल गए हो चौमासा के लिए. केवल ३०-३५  जैन घर होते हुए भी सभी इतनी उत्तम व्यवस्था यहाँ देखि गयी.

महाराजजी के आहार होने के बाद जब हम अपने चौकें में जाने लगते तोह कोई न कोई आकर हम में से कुछ लोगों को अपने चौके में भोजन के लिये आग्रह कर के ले जाता और खाने खिलाने के मामले में तो वैसेभी राजस्थान बहोत प्रसिद्ध है. 

शहर से दूर होके भी किसीभी चीज़ की कमी महसूस होने नही दी. और जीवनभर के लिए एक पाठ हम शहरवासियो के लिए पढ़ा दीया. 



 कहानी वाला गांव  आज बिना खोजे ही मिल गया, 
चतुर्थ कालीन चर्या कैसी होगी इसका पता लग गया,
गांव में सुन्दर बह रही है ब्राम्ही लेके अपना पानी,
गांव का बच्चा बच्चा जाने जिनवाणी,
सब काम खुदसे करते है न सेवक लगे न नौकरानी,
अनाज उगायें खेतों में, और गाय के दूध की गंगा नहायी,
औरते चलती है सिर ढकके और पुरुष रखे पोशाख में सादगी,
आज भी सब साथ साथ चल रहे है लेके अपना धर्म और संस्कृति,
हम शहरवालों को अब तक नाज़ था लेके अपनी दुनियादारी,
आधुनिकता से भरा जीवन और ढेर सारी पैसोंकी कमाई,
बोराव जाके पता चला क्या है सच्ची जिंदगानी,
न पैसा साथ आएगा न ये सुखोंकी चटाई,
साथ लेके जाओगे वो है धर्म ने दी हुई सिखाई,


सब नाज़ वही के वही उतर गया ....
कहानी वाला गांव  आज बिना खोजे ही मिल गया 

Wednesday, 17 May 2017

मी आणि स्वयंपाकघर .....


 बाईचे  आणि स्वयंपाकघराचे नाते  हे  कितीतरी प्रकारचे असू शकतात, कोणाचं नातं हे कामापुरते असेल ,कुणाचे  सुट्टीच्या दिवसांपुरते मर्यादित ,कुणाचे रोजचे जिवाभावाचे घट्ट ..... माझं नातं तिसऱ्या प्रकारात मोडतं . मुळातच "खावे तर चवीने ,जगावे तर मानाने "ह्या वळणावर सरळ चालणारी मी . सकाळच्या चहाचा  स्वादसुद्धा कसा दरवळला पाहिजे आणि त्याच्या वाफेसोबत आपला  दिवसही प्रसन्न असायला पाहिजे . जोडीला गरम गरम   पोहे ,त्यावर खुलून दिसणारी हिरवी कोथिंबीर आणि बाजूला डोकावणारी लिंबूची फोड जेव्हा समोर येते तेव्हा सुटणारे पोट ,सुरु असलेले डाएटिंग ,ह्याचा विसर पडतो. हे   समीकरण म्हणजे लग्ग्न जुळवून आणि नंतर टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. मुलगी पसंत नव्हती पण पोहे आणि चहा ह्याच्या चवीला बघून हो म्हणालो बर का!!त्यावरून तू उत्तम गृहिणी पण असशील हे ओळखलं म्हणून लग्ग्न केलं ..... इति नखरे असलेले आमचे नवरे . मुळातच मला हॉटेल मध्ये जाऊन किंवा मागवून जेवणे हे पटत नाही. तिथली बाहेरची चकाकी सोडली तर आतमधली चकाकीवर न बोललेले बरे शिवाय पैसे फेकून मागवले अन्न हे कुठल्या भावनेने बनवले असणार ? पण आम्ही मात्र आमचं स्टेटस सिम्बॉल जपून ठेव ण्यासाठी महागड्या हॉटेल मध्ये जातोच ,तिथलं टोमॅटो सूप ओरपून , ... आईच्या हातची चव नाही बाबा अस म्हणत वीकएंड साजरा करतो. कशी असणार ??पदर खोचून ,सकाळपासून राबून ,प्रेमाने ,आनंदाने बनवलेले साधे वरण ,भात ,भाजी ,पोळीचे जेवण सुद्धा भुकेच्या वेळेच्या आधीच समोर  येते त्याची किंमत नाही मोजता येणार ,हॉटेलच्या जेवणाची सर देखील नाही येणार . घरी आलेला पाहुणा तोही माहेरचा असेल तर मग विचारायलाच नको (खरं असेलही कदाचित .... नवऱ्याची टिपणी )स्वयंपाकघरातुन येणारे आवाज ,सुगंध हे रोजच्यापेक्षा वेगळे येतात . आणि आलेला पाहुणा हा खाण्यासाठीच आलेला होता अस वाटायला लागत कारण आहेच तस ..... वरणाची फोडणी हि जादाची हिंग,कढीपत्ता ,कोकम आमसूल घालून केलेली असते, चवीला रोजची कोशिंबीर  असतेच पण सोबत तीन रंगाच्या वेगवेगळ्या चटन्या हि  असतात , लोणच्याची जुनी भरणी निघाली असते त्याबरोबरच काजू पेरलेला शिरा ,तूप मोकळ्या हाताने सोडलेली गरम पोळी, मऊ भात ,आंब्याच्या रसाची वाटी चारोळी घालून सजवली असते. दुपारचा खमंग चिवडा ,भेळ ,    आ इसक्रीम ,संध्याकाळी चायनीज ,साऊथ  इंडियन .... घर बसल्या हॉटेल चे मेनू मिळतात ... जीवन फक्त खाण्यासाठीच आहे ... आणि ते खरंच सुंदर आहे. हा आभास होतो . 
नवीन लग्न होऊन घरी आली तेव्हा आपल्याला स्वयंपाकघराचा ताबा मिळणारच नाही अस वाटत होते कारण एक सुगरण हात तिथे असतांना माझे काम फक्त भाजी वाणवणे ,कणिक मळणे ,पाणी भरणे एवढेच होते पण हळू हळू तो सुगरणपणाचा वारसा सुनेकडे सोपवून त्या निवृत्त कधी झाल्या हे कळलेच नाही . पण मला अजूनही त्यांची नजर इकडेच आहे अस वाटत म्हणून कि काय स्वयंपाक अजून रुचकर होतो. रेसिपी वाचून आपल्याला मीठ ,तेल टाकता येऊ शकत पण साखरेचा दोन तारी आणि गुळाचा एक तरी पाक ओळखायला ,भाजी करपायचा वास ओळखायला अनुभवाचे बोल लागतात . आमच्या दोघींच्या भांड्याचा आवाज हा कधी वाढलाच नाही. तो कायम एकमेकांना सांभाळत येत आहे ... त्यामुळे पदार्थांचे  दरवाळणारे सुगंध हे अजूनही  येत राहतात .तसेच भाजिला जास्त झालेलं तिखट ,कमी पडलेलं मीठ हे कधीही आमची चव घालवत नाही . 

   Mom's kitchen open for 24 hours 
Image result for  kitchen watches

Wednesday, 19 February 2014

सप्त पदी मी रोज चालते ......

सप्त पदी मी  रोज चालते ......


तुझ्या सवे हे शतजन्मीचे हो माझे नाते......"


लग्नानंतरचे सगळच  गूढ दडलाय ह्या दोन वाक्यात ..सात पावल टाकताना प्रत्येक पावलावर घेतलेली शपथ देवाला साक्षी मानूनहजारो लोकांच्या अक्षतांच्या सहायाने "लग्न"हा मंगल सोहळा पार पडतो.आणि प्रत्येक मुलीच्या   आयुष्यातला हा turning  point ठरतो.love  marriage असू दे किंवा arrange  marriage एका मराठी मुलीला धाकधूक हे वाटतेच,कारण तिच्यावर असलेला संस्काराचा पगडा.आजीकडून,आईकडून नकळत  "मुलीची जात"हे कितीदा तरी ऐकलेल असतं .आतापर्यंत जुळवत आणलेल्या नात्यांना स्वल्पविराम द्यायचा असतो.आणि पुढची नवीन स्वप्ने ,नवीन लोक,नवीन नाती,नवीन पद्धती हे सगळ आपलास करून करून चालू करायचा असतो नवीन प्रवास..........
एक एक काडी  जमा करून चिमणा चिमणी घरट बांधायला चालू करतात... काही क्षणासाठी असलेल भांडण ...काही क्षणांना केलेली तडजोड , ,न बोलता एकेमेकांना कळलेली भाषा ,रोजचच असला तरी वाट पाहणं ,कोणाची तरी सून ,मामीवाहिनी,काकू  ,बायको ह्या नात्यांची सांगड घालावी लागते.येणारा प्रत्येक क्षण हा नवीनच असतो.आतापर्यंत आईचा सेकंड hand  असणारीला जेव्हा पुरण पोळी स्वत: करण्याची वेळ आल्यावर  तारांबळ उडते.पुरणपोळी करायला घेतलेले कष्ट आणि जमल्यावर होणारा आनंद हा अवर्णनीय असतो."अरे संसार संसार जसा तवा  चुल्यावर ,आधी हाताला चटके मग मिळते  भाकर " हे बहिना बाईंचे वाक्य आजकालच्या मुली'ना  काही वेगळ्या प्रकारे लागू पडत."अरे स्वयांपक  स्वयांपक जमला तर ठीक नाही तर चल हॉटेलवर  "
  भाजी कुठली करायची त्या प्रश्नापासून ते चुलत दिराच्या लग्नात साडी कुठली घालायची ,पुढच्या आठवड्यात येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई हे management  कस करायचंह्याच उत्तर शोधण्यात दिवसातला बराच वेळ खर्ची पडतो.घरात असतांना आईने दिलेल्या  हाकेला नक्की काहीतरी काम असेल ,म्हणून उशिरा  आवज देणारी मी ,मैत्रिणींसोबत jeans, T -shirt  घालून पुणे पालथ घालणारी मी,आता उत्कृष्ट रित्या स्वयांपाक्क्घर सांभाळू शकते.हा झालेला बदल मलाच माझा नवीन आहे..........


(ता .क ):-लग्नाला पूर्ण झालेल एक वर्ष आणि माझ्यात झालेला बदल ,मागे वळून बघतांना सुचलेला हा Blog !) 
  


Thursday, 1 August 2013

माझ्या शब्दांच्या थैलीतून सांडलेल्या ढिगभर गोष्टी

एक कटिंग चाय ................भुरभुरणारा पाऊस ,हवेतला गारवा ,सगळीकडे पसरलेली हिरवळ गप्पांमध्ये रंगलेली तरुणाई आणि एक कटिंग चाय किती झकास combination आहे ना हे ?तुम्ही काहीही म्हणा पण चायची तलब काही औरच आहे .प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक टपरी तर असतेच ,आणि तिथला मामा म्हणजे फारच फ़ेमस कॉलेजमधील lectures मध्ये घालवलेला वेळ आठवला तर तो  फारच थोडा होता पण या टपरीवर मात्र जीवापाड प्रेम .  आयुष्यातले बरेचसे अनुभव हे इथेच  आले . कटिंग चहासोबत कितीतरी गोष्टी मित्रांनी share केल्या असतील मित्राची प्रत्येक अडचण आपली आहे आणि मी ती  सोडवण्याचा ठेका   घेतलाय या आवेशात कितीतरी अडचणी या चहासोबत गार झाल्या असतील मग ती पैश्यांची असू देत नाही तर पोरीची !नवीन मित्र जोडण्याची हीच एक जागा.  आपली पहिली भेट कुठे झाली होती रे हा प्रश्न बऱ्याच वर्षानंतर मित्राला विचारा नकळत उत्तर येत "मामाची टपरी यार………… "कोणी तिथे पहिल प्रेम यक्त केल असेल , रोज चोरून बघण्याची त्याची तगमग त्या चहासोबत यक्त झाली असेल. तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर नकळत तिच्या पापण्या हातात असलेल्या पेल्यावर स्थिरावल्या असतील . आणि मग दोघांचेही शब्द चहाच्या वाफेमध्ये विरून गेले असतील . अशा एक न अनेक आठवणी त्या कटिंग चहा सोबत जोडल्या गेल्या असतील . रात्री उशिरापर्यंत जागून लिहिलेले journals आणि PL मध्ये हटकून येणारी झोप हे घालवण्यासठी टपरीच्या कितीदा तरी वाऱ्या झाल्या असतील . कुठलही celebration हे चहानीच करायचं हा तर जणू अधोरेखित नियमच . तिथे बसून तासान तास निघून जायचा पण lecture मधला एक मिनिट  एका तासास्रखा जड जातो . प्रत्येकाच्या जीवनात चहासोबत आठवणाऱ्या आठवणी असतीलच . आणि ह्या मामांची चहा बनवायची पद्धतही खूप वेगळी असते भट्ट्याचा यज्ञ पेटवल्यावर साखर चहा आणि दूध याची आहुती टाकली जाते . अद्रकाचा सुगंध दरवळतो आणि चहाचे पातेले वर  करून ते धार कपात सोडली जाते आणि हे सगळं एका लयीत चाललं असत ... चहाला गरीब श्रीमंतीचा भेद नाही ज्या प्रकारे तो गरीबाच्या झोपडीत कमी दूध घालून बनतो त्याचप्रमाणे तो high क्लास लोकांमध्ये सुद्धा काचेच्या कपातून सर्व्ह होतो. चहाला वेळ नसते ... तो दिवसाला कधीही चालतो ...फक्त दोन पेक्षा जास्त वेळ झाला की "तुम्ही तुमचा करून घ्या आता "अस ऐकायला मिळत . मित्रांसोबत घेतलेला चहा ... आनंदी तर मैत्रीणीसोबत घेतलेला चहा एक एक घोट नजरेत बघत ,आणि मीटिंग मध्ये बॉस सोबत घेतलेला चहा आता या कामासाठी माझ्याकडे पाहू नये म्हणून तोंड लपवण्यासाठी तर मशीनचा चहा ऑफिसमधला वेळ घालवण्यासाठी असतो .कॉलेज मध्ये कोणी फुकट चहा पाजत असेल तर मित्रांची झुंबड निघते . रेल्वे मध्ये फिरणारे फेरीवाले चाययय  ssss या आवाजांनी स्टेशन आलाय हे कळतं .सर्दी खोकल्यावर घेतला जाणारा रामबाण उपाय म्हणजे गवती चहा. 

पुण्यात लिहलेलं वाक्य आठवत "चहाला वेळ नसते ,पण वेळेवर चहा लागतो "


Wednesday, 26 June 2013

माझ्यातली आदर्श गृहिणी


सकाळी सहा वाजता घड्याळीचा गझर बंद करून माझ्या दिवसाची 

सुरवात होते . अजून ५ min झोपायला मिळाल तर मजा येईल असा 

विचार करून डोळे बंद केले की  समोर असलेल्या  कामांची यादी 

डोळ्यांसमोर नाचू लागते . आणि वेळेतच उरकल पाहिजे अशी deadline 
समोर दिसल्यावर माझी मजा चांगलीच झिरते .तिथुन चालू होतो 

माझ्या दिवसभराचा न थकणारा प्रवास . सकाळच्या प्राथमिक क्रिया 

आटपून माझा स्वंपाकघरात प्रवेश होतो. अजून देवाने दोन हात द्यायला 

हवे होते ही खंत मनाला लागते . कुठल्याही कामाला २ min जास्त देण मला परवडण्यासारख नसतं .एकच वेळला  स्वंपाकघरातुन वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळया चवीचे  सुंगंध दरवळू लागतात . रेडीओ मिर्चीवाला  R.J तुमचा दिवस चांगला जो म्हणून शुभेछा देत असतो. त्यावेळला मनात येत त्यापेक्षा "सगळ वेळेत होओ "ह्या शुभेछा सुद्धा चालतील . दुध ,चहा,नाश्ता आणि जेवण हे बनवून दोन घास कसेबसे कोंबले जातात . जेवण डब्यात बंद करून कॉलेजचे वेध लागतात . स्वतःला आरशात बघण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो . जाता जाताच पेपरची ठळक बातमी वाचली जाते . आपल्या आजूबाजूला काय चाललय हे शिळ झाल्यानंतर कळतं . मोबाईल ,पर्सें ,चाबी , डबा ,घड्याळ ह्याची मनात उजळणी करून माझा ८"३ चा टोल  पडतो . नवरयाचा "सावकाश जा "असा आवाज पायरया उतरताना कानात पडतो . आणि सावकाश चालणारी माझी गाडी स्पीड घेऊन वेळेत ,१ सेकंद आधी  कॉलेजमध्ये पोहचते तेव्हा "हुश्य " असा उद्गार निघाल्याशिवाय राहत नाही . आणि मी एका पूर्णपणे वेगळ्या अशा झोन  मध्ये एन्ट्री केलेली असते . 
दिवसभरात घ्यायची lectures ,practicals ह्याची तयारी सुरु होते. राहिलेल्या वेळेत मीटिंग्स  कॉलेजची इतर कामे आणि त्याच्या deadlines सांभाळावी लागतात . एखाद्यावेळी गणितातील समीकरण बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार करून सोडवण सोप आहे पण आयुष्याची समीकरणं सोडवताना काय वगळायच आणि काय बाकी ठेवायचं हेच काळात नाही . परत  कॉलेजचा परीघ ओलांडून माझी गाडी घराकडे धावते . तेव्हा आठवत काल सासूबाईचा फोन आला होता , त्यांच्या माहेरची लोक जेवायला येणार आहेत संध्याकाळच्या कामांची यादी परत माझ्या डोळ्यासमोर उभी ठाकते . जातांना घेऊन जाण्याचे सामान ,भाजीपाला पिशवीत घालून दरवाजा उघडल्या जातो . तेव्हा स्वतःसाठी केलेला एक कप चहा ,मिळालेली निवांत १ ० min खूप सुखून जातात . आणि  पाहुण्यांचा पाहुणचार ,गप्पा गोष्टी आटपून माझा दिवसभराचा प्रवास १ ० च्या ठोक्याला संपतो . 
रविवारची आतुरतेने वाट बघितली जाते ,कारण त्यादिवशी वाट्याला थोडासा निवांतपणा आला असतो . आणि मग ठरतात outings ,movies ,shopping किंवा एखादी नवीन कादंबरी ,मैत्रिणीला भेटायचे plans  आणि तेवढाच काय तो विरंगुळा . 
पण मनोमन विचार येतो अस का झालाय? …………………………
अस्थिरता ,कामच प्रेशर ,आ वासून बसलेल्या डेडलाईन ,घरच्या जबाबदाऱ्या हे दृष्टचक्र गंभीर रूप घेत आहे . आणि या साऱ्याशी  अभाव आहे संवादाचा .देवसाठी दिवसातली १ ० min सुद्धा  महाग  होतात . कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललय 
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असतांना ,छोट्याछोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग होत चाललाय . अचानक आलेली पावसाची सर, नुकताच उमलेलं फुल ,जुन्या आवडत्या गाण्याची धून . सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत?
आयुष्य म्हणजे ट्राफिक जॅम ,कर्कश हॉर्नचे आवाज,खणखणलेले रस्ते,डेडलाईन ,इ एम आए चे चेक अस का झालंय ?

                                 
               

Tuesday, 18 June 2013

मला दिसलेलं भविष्य …।

उन उतरणीला आली होती बाहेर हलकासा पाऊस  आवाज करत होता . तोच परिचित गारवा …. आता आपली मैत्रीनिनसोबत गप्पा मारायची वेळ झाली आहे हे मला कळून चुकले. बाहेरच्या पावसाचा आवाजच आनंद देणारा होता पण रोजनिशीचा एक भाग म्हणून सोफ्यावरून  उठून मी आपल्या खोलीकडे जायला वळली  पण आपला घसा कोरडा झालाय हे लक्षात येताच ४ 0 डेसिबल पेक्षाही कमी आवाज sense करू शकणाऱ्या  रोबोट्ने श्वासोश्वास ओळखला आणि त्याच्यामध्ये फीड केलेल्या program प्रमाणे अगदी यांत्रिकी आपुलकीने "पाणी दुध ज्यूस " असे तीन पर्याय दिले आणि विचारपूस केली.orange  flavor ज्यूस हा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये असणाऱ्या शर्करेचे (sugar )  चे मोजमापक माझ्यासमोर वाचले त्यामुळे माझा रक्तदाब वाढेल ह्याचा पाढा रोबोट्ने वाचला मी  रागाने जीभ चावुन फक्त पाणी आण अशी आज्ञा केली . माझ्या family डॉक्टर ने त्यात काही commands save  केल्या होत्या आणि तो रोबोट त्याप्रमाणे बोलत होता . 
fingerprints  देऊन मी खोलीचा दरवाजा उघडला खोलित येताच सगळी विद्युत उपकरणे चालू झाली .remote हातात घेऊन बटन दाबताच गुलाबी रंगाचे हिरवी किनार असलेले पडदे सरकले. आणि माझ्या स्क्रीन वर अनुक्रमे खालील पर्याय झळकले ……. 
१) फोन करणार  ?
२) T .V बघणार ?
३) खरेदी ?
४)घरची कामे ?
५) इंटरनेट हवेय ?
६) इतर काही मदत ?

मी पहिला पर्याय निवडला लगेच ६-G  च्या मदतीने माझी मैत्रिण मला समोर दिसू लागली . कुठे बसायचं ? अस जुजबी बोलण झाल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसुया असे ठरवले आणि call मागची theme मंदिरची पायरी निवडली .virtual पायरीवर आम्ही बसलो होतो आतमध्ये देव मात्र तोच होता …। आणि गप्पांना सुरवात झाली …। 

कशी आहेस सून काय म्हणते पासून ते रेवा (आमची तीसरी मैत्रीण ) हल्ली call वर येत नाही इथपर्यंत सगळ बोलून झाल . अजून Advance उपकरण येणार आहेत येत्या दिवाळीला घरी असा तिच्याकडून कळल . बहुतेक मनातल्या भावनाही न बोलता sense  केल्या जातील असा वाटतय . खूप मूड होतोय बागेत जाण्याचा पण virtual नाही …। असा म्हणताच मी पण दुजोरा दिला . आणि कधीची जागा available आहे हे पहिले आणि १ जाने  २ 0 ४ ७  निवडली . माझी मैत्रीण कुठलातरी विचार करतेय हे कळल्यावर मी तिला आठवण करून दिली " रोबोट्ने expression sense केलेत तर मुलाला आणि सुनेला sms जाईल"आणि हे ऐकताच तिने कसेबसे हसू आनले. 

काल माझ्या नातीने मला तुमच्या काळातील कॉम्पुटर ची गोष्ट सांग आणि तिला तिच्या मिस ने मामा वर essay लिहायला लावला गुगलवादी नको असा सांगितलय   म्हणून तिने माझ्याकडे   हट्टच धरला…। कॉम्पुटर ची गोष्टीचा ।   तेव्हा आपल्याला किती कौतुक होत त्या आधुनिक गोष्टीच………….  लोक जवळ आली जग जवळ आला अस वाटत होत पण ते एवढ आधुनिक होऊन यंत्रच आपल्या माणसांची काळजी घेइल. आपल्या लोकांशी केव्हा  बोलायचं हे जिवंत चेहरया ऐवजी कृत्रिम रोबोट ठरवेल असा वाटल नव्हत . 
ह्या पिढीने सोयीस्कर रित्या आपली वागणूक आधुनिक केलीय पण आपलेपणा गमावलाय …। माझी आई सांगायची मामाचा गाव कस होत ते पण आता "मामा कोण असतो" हे कस सांगाव या पिढीला ……………?

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...