Wednesday 26 June 2013

माझ्यातली आदर्श गृहिणी


सकाळी सहा वाजता घड्याळीचा गझर बंद करून माझ्या दिवसाची 

सुरवात होते . अजून ५ min झोपायला मिळाल तर मजा येईल असा 

विचार करून डोळे बंद केले की  समोर असलेल्या  कामांची यादी 

डोळ्यांसमोर नाचू लागते . आणि वेळेतच उरकल पाहिजे अशी deadline 
समोर दिसल्यावर माझी मजा चांगलीच झिरते .तिथुन चालू होतो 

माझ्या दिवसभराचा न थकणारा प्रवास . सकाळच्या प्राथमिक क्रिया 

आटपून माझा स्वंपाकघरात प्रवेश होतो. अजून देवाने दोन हात द्यायला 

हवे होते ही खंत मनाला लागते . कुठल्याही कामाला २ min जास्त देण मला परवडण्यासारख नसतं .एकच वेळला  स्वंपाकघरातुन वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळया चवीचे  सुंगंध दरवळू लागतात . रेडीओ मिर्चीवाला  R.J तुमचा दिवस चांगला जो म्हणून शुभेछा देत असतो. त्यावेळला मनात येत त्यापेक्षा "सगळ वेळेत होओ "ह्या शुभेछा सुद्धा चालतील . दुध ,चहा,नाश्ता आणि जेवण हे बनवून दोन घास कसेबसे कोंबले जातात . जेवण डब्यात बंद करून कॉलेजचे वेध लागतात . स्वतःला आरशात बघण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो . जाता जाताच पेपरची ठळक बातमी वाचली जाते . आपल्या आजूबाजूला काय चाललय हे शिळ झाल्यानंतर कळतं . मोबाईल ,पर्सें ,चाबी , डबा ,घड्याळ ह्याची मनात उजळणी करून माझा ८"३ चा टोल  पडतो . नवरयाचा "सावकाश जा "असा आवाज पायरया उतरताना कानात पडतो . आणि सावकाश चालणारी माझी गाडी स्पीड घेऊन वेळेत ,१ सेकंद आधी  कॉलेजमध्ये पोहचते तेव्हा "हुश्य " असा उद्गार निघाल्याशिवाय राहत नाही . आणि मी एका पूर्णपणे वेगळ्या अशा झोन  मध्ये एन्ट्री केलेली असते . 
दिवसभरात घ्यायची lectures ,practicals ह्याची तयारी सुरु होते. राहिलेल्या वेळेत मीटिंग्स  कॉलेजची इतर कामे आणि त्याच्या deadlines सांभाळावी लागतात . एखाद्यावेळी गणितातील समीकरण बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार करून सोडवण सोप आहे पण आयुष्याची समीकरणं सोडवताना काय वगळायच आणि काय बाकी ठेवायचं हेच काळात नाही . परत  कॉलेजचा परीघ ओलांडून माझी गाडी घराकडे धावते . तेव्हा आठवत काल सासूबाईचा फोन आला होता , त्यांच्या माहेरची लोक जेवायला येणार आहेत संध्याकाळच्या कामांची यादी परत माझ्या डोळ्यासमोर उभी ठाकते . जातांना घेऊन जाण्याचे सामान ,भाजीपाला पिशवीत घालून दरवाजा उघडल्या जातो . तेव्हा स्वतःसाठी केलेला एक कप चहा ,मिळालेली निवांत १ ० min खूप सुखून जातात . आणि  पाहुण्यांचा पाहुणचार ,गप्पा गोष्टी आटपून माझा दिवसभराचा प्रवास १ ० च्या ठोक्याला संपतो . 
रविवारची आतुरतेने वाट बघितली जाते ,कारण त्यादिवशी वाट्याला थोडासा निवांतपणा आला असतो . आणि मग ठरतात outings ,movies ,shopping किंवा एखादी नवीन कादंबरी ,मैत्रिणीला भेटायचे plans  आणि तेवढाच काय तो विरंगुळा . 
पण मनोमन विचार येतो अस का झालाय? …………………………
अस्थिरता ,कामच प्रेशर ,आ वासून बसलेल्या डेडलाईन ,घरच्या जबाबदाऱ्या हे दृष्टचक्र गंभीर रूप घेत आहे . आणि या साऱ्याशी  अभाव आहे संवादाचा .देवसाठी दिवसातली १ ० min सुद्धा  महाग  होतात . कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललय 
प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असतांना ,छोट्याछोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग होत चाललाय . अचानक आलेली पावसाची सर, नुकताच उमलेलं फुल ,जुन्या आवडत्या गाण्याची धून . सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत?
आयुष्य म्हणजे ट्राफिक जॅम ,कर्कश हॉर्नचे आवाज,खणखणलेले रस्ते,डेडलाईन ,इ एम आए चे चेक अस का झालंय ?

                                 
               

Tuesday 18 June 2013

मला दिसलेलं भविष्य …।

उन उतरणीला आली होती बाहेर हलकासा पाऊस  आवाज करत होता . तोच परिचित गारवा …. आता आपली मैत्रीनिनसोबत गप्पा मारायची वेळ झाली आहे हे मला कळून चुकले. बाहेरच्या पावसाचा आवाजच आनंद देणारा होता पण रोजनिशीचा एक भाग म्हणून सोफ्यावरून  उठून मी आपल्या खोलीकडे जायला वळली  पण आपला घसा कोरडा झालाय हे लक्षात येताच ४ 0 डेसिबल पेक्षाही कमी आवाज sense करू शकणाऱ्या  रोबोट्ने श्वासोश्वास ओळखला आणि त्याच्यामध्ये फीड केलेल्या program प्रमाणे अगदी यांत्रिकी आपुलकीने "पाणी दुध ज्यूस " असे तीन पर्याय दिले आणि विचारपूस केली.orange  flavor ज्यूस हा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये असणाऱ्या शर्करेचे (sugar )  चे मोजमापक माझ्यासमोर वाचले त्यामुळे माझा रक्तदाब वाढेल ह्याचा पाढा रोबोट्ने वाचला मी  रागाने जीभ चावुन फक्त पाणी आण अशी आज्ञा केली . माझ्या family डॉक्टर ने त्यात काही commands save  केल्या होत्या आणि तो रोबोट त्याप्रमाणे बोलत होता . 
fingerprints  देऊन मी खोलीचा दरवाजा उघडला खोलित येताच सगळी विद्युत उपकरणे चालू झाली .remote हातात घेऊन बटन दाबताच गुलाबी रंगाचे हिरवी किनार असलेले पडदे सरकले. आणि माझ्या स्क्रीन वर अनुक्रमे खालील पर्याय झळकले ……. 
१) फोन करणार  ?
२) T .V बघणार ?
३) खरेदी ?
४)घरची कामे ?
५) इंटरनेट हवेय ?
६) इतर काही मदत ?

मी पहिला पर्याय निवडला लगेच ६-G  च्या मदतीने माझी मैत्रिण मला समोर दिसू लागली . कुठे बसायचं ? अस जुजबी बोलण झाल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसुया असे ठरवले आणि call मागची theme मंदिरची पायरी निवडली .virtual पायरीवर आम्ही बसलो होतो आतमध्ये देव मात्र तोच होता …। आणि गप्पांना सुरवात झाली …। 

कशी आहेस सून काय म्हणते पासून ते रेवा (आमची तीसरी मैत्रीण ) हल्ली call वर येत नाही इथपर्यंत सगळ बोलून झाल . अजून Advance उपकरण येणार आहेत येत्या दिवाळीला घरी असा तिच्याकडून कळल . बहुतेक मनातल्या भावनाही न बोलता sense  केल्या जातील असा वाटतय . खूप मूड होतोय बागेत जाण्याचा पण virtual नाही …। असा म्हणताच मी पण दुजोरा दिला . आणि कधीची जागा available आहे हे पहिले आणि १ जाने  २ 0 ४ ७  निवडली . माझी मैत्रीण कुठलातरी विचार करतेय हे कळल्यावर मी तिला आठवण करून दिली " रोबोट्ने expression sense केलेत तर मुलाला आणि सुनेला sms जाईल"आणि हे ऐकताच तिने कसेबसे हसू आनले. 

काल माझ्या नातीने मला तुमच्या काळातील कॉम्पुटर ची गोष्ट सांग आणि तिला तिच्या मिस ने मामा वर essay लिहायला लावला गुगलवादी नको असा सांगितलय   म्हणून तिने माझ्याकडे   हट्टच धरला…। कॉम्पुटर ची गोष्टीचा ।   तेव्हा आपल्याला किती कौतुक होत त्या आधुनिक गोष्टीच………….  लोक जवळ आली जग जवळ आला अस वाटत होत पण ते एवढ आधुनिक होऊन यंत्रच आपल्या माणसांची काळजी घेइल. आपल्या लोकांशी केव्हा  बोलायचं हे जिवंत चेहरया ऐवजी कृत्रिम रोबोट ठरवेल असा वाटल नव्हत . 
ह्या पिढीने सोयीस्कर रित्या आपली वागणूक आधुनिक केलीय पण आपलेपणा गमावलाय …। माझी आई सांगायची मामाचा गाव कस होत ते पण आता "मामा कोण असतो" हे कस सांगाव या पिढीला ……………?

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...