सप्त पदी मी रोज चालते ......
तुझ्या सवे हे शतजन्मीचे हो माझे नाते......"
लग्नानंतरचे सगळच गूढ दडलाय ह्या दोन वाक्यात ..सात पावल टाकताना प्रत्येक पावलावर घेतलेली शपथ देवाला साक्षी मानून, हजारो लोकांच्या अक्षतांच्या सहायाने "लग्न"हा मंगल सोहळा पार पडतो.आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा turning point ठरतो.love marriage असू दे किंवा arrange marriage एका मराठी मुलीला धाकधूक हे वाटतेच,कारण तिच्यावर असलेला संस्काराचा पगडा.आजीकडून,आईकडून नकळत "मुलीची जात"हे कितीदा तरी ऐकलेल असतं .आतापर्यंत जुळवत आणलेल्या नात्यांना स्वल्पविराम द्यायचा असतो.आणि पुढची नवीन स्वप्ने ,नवीन लोक,नवीन नाती,नवीन पद्धती हे सगळ आपलास करून करून चालू करायचा असतो नवीन प्रवास..........
एक एक काडी जमा करून चिमणा चिमणी घरट बांधायला चालू करतात... काही क्षणासाठी असलेल भांडण ...काही क्षणांना केलेली तडजोड , ,न बोलता एकेमेकांना कळलेली भाषा ,रोजचच असला तरी वाट पाहणं ,कोणाची तरी सून ,मामी, वाहिनी,काकू ,बायको ह्या नात्यांची सांगड घालावी लागते.येणारा प्रत्येक क्षण हा नवीनच असतो.आतापर्यंत आईचा सेकंड hand असणारीला जेव्हा पुरण पोळी स्वत: करण्याची वेळ आल्यावर तारांबळ उडते.पुरणपोळी करायला घेतलेले कष्ट आणि जमल्यावर होणारा आनंद हा अवर्णनीय असतो."अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ,आधी हाताला चटके मग मिळते भाकर " हे बहिना बाईंचे वाक्य आजकालच्या मुली'ना काही वेगळ्या प्रकारे लागू पडत."अरे स्वयांपक स्वयांपक जमला तर ठीक नाही तर चल हॉटेलवर "
भाजी कुठली करायची त्या प्रश्नापासून ते चुलत दिराच्या लग्नात साडी कुठली घालायची ,पुढच्या आठवड्यात येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई हे management कस करायचं? ह्याच उत्तर शोधण्यात दिवसातला बराच वेळ खर्ची पडतो.घरात असतांना आईने दिलेल्या हाकेला नक्की काहीतरी काम असेल ,म्हणून उशिरा आवज देणारी मी ,मैत्रिणींसोबत jeans, T -shirt घालून पुणे पालथ घालणारी मी,आता उत्कृष्ट रित्या स्वयांपाक्क्घर सांभाळू शकते.हा झालेला बदल मलाच माझा नवीन आहे..........
(ता .क ):-लग्नाला पूर्ण झालेल एक वर्ष आणि माझ्यात झालेला बदल ,मागे वळून बघतांना सुचलेला हा Blog !)