Saturday 18 July 2020

होमस्कूलिंग आणि परीक्षा

जेव्हा सक्षमच्या सगळ्या सोसायटी मधल्या मित्रांची परीक्षा असते तो काळ म्हणजे सगळीकडे शुकशुकाट पसरलेला असतो. एक शांतता सगळीकडे विखुरलेली  असते .कोपऱ्यात कुठेतरी बॅट , बॉल ,स्टंप धूळ खात पडलेले असतात ज्या सायकल वर पायडल मारून शर्यत लावली जाते ती सायकल पार्किंग मध्ये निपचित पडलेली असते .सोसायटी चे प्ले ग्राउंड एकदम सामसूम झालेले असते रोज मुलांच्या होणाऱ्या  किलबिलाटाची जागा  आता फक्त झोक्याच्या हवेने हलणाऱ्या आवाजाने घेतलेली असते. समस्त आई वर्ग हा वेगळ्या काळजीत गढलेला दिसतो सकाळचे मॉर्निंग walk असेल किंवा भाजी घ्यायला आलेला आई लोकांचा गोळका  असेल समस्त चिंता वाहून ह्या वावरत असतात त्यासाठी एकच असलेलं कारण म्हणजे सगळ्या मुलांची  नुकतीच  सुरु झालेली  परीक्षा. परीक्षेच्या काळामध्ये घरचे वातावरण बदललेले असते ,टेलिव्हिजन च्या आवडत्या सिरीयलस  आजी डोळे बारीक करून ,हळू आवाजात ऐकत असते ,आई काम लवकर उरकून रिविजन घेण्यात मग्न असते ,बाबा आपला आपला चहा स्वतः करून घेत असतात कारण काहीतरी वेगळं घडणार असतं  किंवा त्याला नको तेवढं महत्व देऊन आपण ओझं वाहत असतो. 
होमस्कूलिंग आणि परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास मी विविध पैलू उलगडून करायचा प्रयत्न केला.मला सापडलेले उत्तर मांडण्याचा प्रयत्न सक्षम च्या  निरागस विश्वातून करते आहे .  ते पैलू प्रश्न  स्वरूपाने समोर आले ते असे ... एवढे सुंदर ,वेगवेगळे आयुष्य बाहेर बघायला मिळत असताना आपण का ४ रूम च्या बंदिस्त कप्प्यामध्ये शिकावं ?आणि तेही केवळ परीक्षेसाठी त्यापेक्षा जगातील निरनिराळे  अनुभव घ्यायचे,स्वतः अनुभवायचे आणि आपले इवलुएशन करायचे असे झाले तर ?शिक्षण म्हणजे फक्त शाळा हे समीकरण थोडं बाजूला ठेऊन निसर्गात जाऊन शिकलो तर ? 
आजूबाजूचेच उदाहरण घ्या ना शाळा आहे म्हणून आपण कितीतरी परिवारातील कार्यक्रम जगायचे सोडून देतो पण परीक्षा पेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते ४ वेगवेगळया स्वभाव असलेल्या लोकांना भेटणं  फक्त परीक्षा हे आयुष्य जगण्याचे अंतिम ध्येय असूच शकत नाही त्यापेक्षा सहज कुठल्याही वातावरणात सामावून जाणे हा धडा आपल्यासाठी जास्त महतवाचा असू  शकतो. जिथे जाऊ तिथल्या प्रकृती  सोबत  एकरूप होणे हा बदल स्वतःमध्ये घडवणे हि एक परीक्षा असू  शकते.  ह्याबाबतीत शहरातल्या मुलांपेक्षा मी छोट्या गावतल्या मुलांना खूप नशीबवान समजते कारण पुस्तकी म्हणजे कोणीतरी आधीच लिहून ठेवलेल्या एखाद्या धड्यापेक्षा स्वतः काहीतरी बनवून गिरवलेला ,अजमावलेला धडा हा जास्त आनंददायी असू शकतो.एखाद्या पहिलीतल्या मुलाला जस झाड दाखून पान ,फळ ,फुल हे त्याचे विविध अंग आहे आणि परीक्षेत ते विचारतात म्हणून खूप महत्वाचे आहे असे सांगून  फक्त डोळ्यासमोर काही मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे त्या मुलासाठी अंतिम ध्येय असू शकते ह्याच्या विरुद्ध  त्यापेक्षा बी पेरल्यापासून झाड मोठं होई  पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवने आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले अंतिम ध्येय आहे हे शिक्षण एक सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मदत करते ज्याची आता सगळ्यात जास्त गरज आहे. शाळेची परीक्षा आणि जीवनाची परीक्षा ह्यामध्ये किती हा दुरावा . जीवनात पहिले अनुभव येतात ,त्याबद्दलचे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात  आणि मग काय वाईट ,काय चांगले हे पडताळून बघून मग योग्य ते निर्णय घ्यावे  लागतात. पण शाळेच्या परीक्षेत मात्र ह्याच्या विरुद्ध ,सर्वात आधी वेगवेगळ्या  विषयाचे ज्ञान डोक्यात  फिट्ट बसवायचे मग पुन्हा त्याला आठवून कागदावर उतरवायचे आणि त्यावरून मूल्यमापन ठरवायचे. 
दोन अनुभव मला ह्यामध्ये नमूद करावेसे वाटतात पहिला  हा माझा स्वतःचा आहे ,इतक्यात परीक्षा म्हणजे काय ह्यावर घरात बरेच संवाद होत होते . मी सक्षम पुढे मांडलेला प्रश्न.... आपण  तुझी परीक्षा घ्यायची का ?इतक्यातच तू सायकल चालवायला शिकलास ना मग आपण एक टेस्ट घेऊया . मला निरुत्तर करणारे त्याचे उत्तर ... "नको इतक्यात ..अजून मला बरेच शिकायचे आहे ... मला परीक्षा कधी द्यायची हे मी ठरवेल आणि तुला सांगेल  !!". होमस्कूलिंग मध्ये परीक्षा देण्याचा हक्क हा मुलांकडे अबाधित राहतो.मला माझ्यामध्ये असलेल्या क्षमता तपासून बघायच्या आहेत असं जेव्हा तो ठरवेल  तेव्हाच इवलुएशन करायचं  हे होमस्कूलिंग मध्ये जमतं .

 


दुसरा अनुभव म्हणजे सुप्रिया जोशी ,मुंबई  एक होमस्कूलर आई दोन्ही मुली शाळेत जात असतांना ,result डे च्या दिवशी सगळ्या मैत्रिणींच्या आई बेंच वर बसून पेपर बघत असत ,५ मार्क कुठे कमी पडले ह्याची सविस्तर चर्चा शिक्षकांसोबत  होत असे ,पण सुप्रिया ताई मात्र ती गुंडाळी हातात घेऊन घरी परत येत असे ,मालविका (सुप्रिया ताईंची  मोठी मुलगी )नेहमी म्हणायची आई तू कधीच टीचर सोबत बोलत नाही ??असे का ??ते बरं दिसत नाही ??तू निदान बेंच वर बसायचं नाटक  तरी करत जा. तेव्हा त्यांचे मालविका साठी सुंदर उत्तर "बेटा ही कागदाची गुंडाळी तुझे भविष्य ठरवू शकत नाही.तुझ्यामध्ये असणाऱ्या स्किल्स ह्या मी ओळखते  ".आज मालविका शाळेत न जाता कुठल्याही डिग्री शिवाय USA च्या MIT युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहे. फक्त तिने स्वतःसाठी एक पोर्टफोलिओ बनवला प्रत्येक  वर्षी तिने आत्मसात केलेल्या तिच्या आवडीच्या क्षेत्रातल्या निरनिराळ्या स्किल्स त्यामध्ये नमूद केल्या . तिचे मूल्यमापन तिनेच केले . कुठलीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी हे तुमच्यामधील स्किल्स ला मार्क देऊन मोजू शकत नाही. 

ए जिंदगी कब तक इन अंको से भरी कागज पर हमे आजमाते रहोगी?
जो अंकपत्र पाने के  लिये पुरी जिंदगी मेहनत कि 
वही कागज वास्तविक जीवन  में  पर्ची बन कर रह जाता  है
 वास्तविक रूप मे  सामने आने  वाले सवाल कुछ और हि होते है  
कब तक हम  ऐसेही  झुलते रहेंगे कागज  और असली एहसास  के बीच 
कागज कि कमाई और एहसास  कि रुहाई अब सिखा दे एक साथ में 

1 comment:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...