आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिवस आता कुठे अंगवळणी पडायला सुरवात झाली होती . रोजचा दिवस कंटाळवाणा न वाटता काहीतरी नवीन शिकण्याची संधीच घेऊन येत होता. प्राणायाम करतांनाच एक सुंदर झुळूक सुंगध घेऊन येत होती . परत परत तोच सुंगंध नाकाजवळ दरवळत होता. डोळे बंद करून मन एकाग्र करून आठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि हो हा सुगंध खूप ओळखीचा होता .....खूप जवळचा होता अरेच्चा !!!हा तर आंब्याच्या मंजिऱ्या चा दरवळणारा सुगंध होता . समोर रो हाऊस मध्ये बरीच आंब्याची झाडे आहेत,त्याला कैऱ्या आलेल्या दिसल्या होत्या पण हा सुंगंध खूप जवळून येत होता. आणि आठवलं ३ दिवसांपूर्वी मैत्रिणी कडून रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी मागवून घेतली होती आणि quarantine च्या सूचनांप्रमाणे त्याला हात ही न लावता ती पेटी सुद्धा काही दिवस quarantine मध्ये एका बाजूला ठेऊन दिली होती.आंबे अजून कच्चे च आहेत असे समजून आम्ही त्याला उघडून पहिले नव्हते . आज जणू हा सकाळी सकाळी दरवळणारा सुगंध त्या रसाळ पिकलेल्या आंब्यांची आठवणच घेऊन आला होता .
एरवी बाकी कुठल्याही ऋतूत न मिळणार हा फळांचा राजा त्याचे अस्तित्व तसेच टिकवून आहे.केवढी ही त्या आंब्याला मिळालेली लोकप्रियता खरंच त्या राजाची बातच निराळी.प्लम , ऑलिव्ह,पीच हि त्याच्याच जातीची फळ पण छे !!त्यांना हि उपमा कुठे ?त्याचा दरारा वेगळा !त्याचा रुबाब वेगळा !त्याचा ढंग वेगळा!त्याची ऐट काही औरच एकंदर आमचा लाडका आंबा खरचं सर्वांमध्ये वेगळा . आंब्याचे पाने सुद्धा एक मंगल कार्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते . आंब्याच्या डहाळ्या दाराला लावून चैत्र महिण्याची सुरवात होते ते गुढीपाढव्याला . पातळ असलेली साल काढून केशरी लालसर रसाळ मधुर,सुगंधित बाहेर आलेला रस बघून मन कसं बघूनच तृप्त होऊन जातं . पुण्यामधली सुजाताची मँगो मस्तानी,खत्री बंधूचे मँगो आईसक्रीम ,दुर्वांकूरचा रस ,चितळे चे आम्रखंड ह्यांना लोकप्रिय करणारा हा आंबाच !!आज मी पण सकाळी सकाळी ह्या आंब्याच्या प्रेमात पडले . आतापर्यंत फक्त आंबा हा बाजारातून आणणे आणि खाणे एवढंच ठाऊक होतं पण lockdown मध्ये चक्क घरीच माच टाकून आंबे पिकवण्याची हि पहिलीच वेळ . २ bhk मध्ये एका कोपऱ्यात हा माच आणि दरवळणारा सुगंध अनुभवण्याची माझी पहिलीच वेळ.एक सुंदर मोहर घरात आलाय आणि त्या चैत्राच्या सुगंधात मन न्हाहून निघतय.
आता बघा ना ,कच्ची छोटुशी हिरवीगार कैरी झाडाला लटकलेली बघून तो तोडण्याचा मोह अजिबात आवरत नाही . तसंच उन्हाळ्यात भेळ बरोबर मीठ लावलेली कैरी म्हणजे अप्रतिम combination. मला आजीची उन्हाळ्यात आवर्जून आठवण येते ती यासाठी कैरी बाजारात आली कि तिची लगबग चालू व्हायची ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. उगाच नाही "लोणचं घाल त्याचं " हि म्हण रुजली. कैरीची चटणी ,कैरीचा तक्कु ,कैरीचे पन्ह एवढंच काय कैरीच्या आतमधली कोय वाळवून त्याची सुपारी ती करायची .केवढा तो उरक आणि केवढी ती हौस !!आज मी हेच सगळं करायला जाते पण तेवढा उसंत मिळत नाही आणि त्याला ती मज्जा पण येत नाही असं का झालं असेल?पदार्थ तेच पण आजीसारखी चव मुळीच नाही . आजी आज या जगात नाही पण तिच्या सुरकुतलेल्या हातांनी बनवलेली लोणच्याची आठवण मनात ताजी आहे .माझी रिकामी बरणी त्या लोणच्याची वाट पाहतेय आणि मन आजीची .....