Monday 21 September 2020

माहेर पणाला गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या काकू

 सोसायटी मधील एक काकूंचा फोन आला "अगं आज घरी एखादी चक्कर मारशील का?"एरवी हे वाक्य खूप सहज होत मी सुद्धा लगेच उठून गेले असते कारण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जायचं होत . काकूंची सून गरोदर होती ५ वा महिना सुरु होता . भावाच्या मुलाच्या लग्नाला माहेरी गेलेल्या काकू लॉकडाऊन  मुळे माहेरच्याच झाल्या होत्या. काकूंचे "चक्कर मारशील का" हे वाक्य  आज खरचं चक्कर आणणारे होते .मला मात्र काकूंनी हक्काने फोन केला होता आणि तिला काहीतरी खावंसं वाटतं असेल किंवा काही त्रास होत असेल हे विचारून मला फक्त फोन वर समाचार दे एवढंच त्यांचं म्हणणं होत. तसं त्याही फोन करून विचारू शकणारच होत्या पण सुनेची रोजची वाक्य ठरलेली होती  "आई मी ठीक आहे तुम्ही काळजी   करू नका. "त्यामुळे मला फक्त खात्री करण्यासाठी समाचार घेण्याचे काम सोपवले होते.

माझ्यासाठी मात्र हे एक संकटच होत . मी जाणे हे लॉक डाउन च्या काळात सुनबाई ला कितपत आवडेल ह्यात शंका होतीच. काकूंचा मात्र रोज एक फोन येत होता माहेरी भावाच्या सुनेचे कौतुक करता करता न थकणाऱ्या काकू आज मात्र धर्मसंकटात पडलेल्या दिसल्या आज सून बाईची आवडती डिश केली होती पण तिला खायला डिजिटल माध्यम आज उपयोगाचं नव्हतं . तंत्रज्ञान कितीही  पुढारलेले असले तरी गरोदर सुने ची आवडती डिश आज आपण पोहचवू शकत नाही  ह्याची आमच्या मॉडर्न म्हणणाऱ्या काकूंना खंत होतीच आणि  त्यांनी  माझ्याकडे व्यक्तही केली. त्यांचं धर्मसंकट आता कोरोना च्या जाळया सारखे माझयापर्यंत येऊन पोहचलं होत  कोरोना मुळे काय करो आणि काय करोना ह्यामध्ये मी अडकले होते.

आणि एका कोरोनामय दुपारी जय्यत तयारी करून (मास्क ,गॉगल ,हॅन्ड ग्लोव्हस ,सॉक्स ) घालून मी निघाले ,बाजूच्या बिल्डिंग मध्ये हो ! ५ मजले चढत जाणे लिफ्ट चा वापर असूनही करायचा नव्हता ,दमछाक होऊन पोहचले ,दारावरची घंटी वाजवावी की कडी वाजवावी ह्या द्विधा मनःस्थिती मी होते. शेवटी कडी वाजवली दार उघडायला बराच वेळ लागला कारणहि तसेच होते ,दुपारच्या कोरोनामय उन्हात कोण आले असेल ?म्हणून नक्कीच प्रश्नवाचक चिन्ह सगळ्यांच्या चेहऱयावर निर्माण झालं होत . काकूंच्या सुनेनेच दरवाजा उघडला ते एक बरं झालं माझं काम थोडं सोपं झालं . माझं पूर्ण पॅकिंग बघून कोण असेल ???असा प्रश्न पडला असावा  मी लगेच तो दूर केला ,आणि येण्याचे कारण पण सांगितले . घरात ये आधी बस थोडा वेळ मग गप्पा मारू असे आमचे नाते होते पण मी घरात जाणार नाही आणि ती घेणार नाही असा अवघड स्तिथीत समाचाराची देवाण घेवाण झाली आणि सगळे क्षेम कुशल जाणून घेतले आणि काकूंना कळवते म्हणून काढता पाय घेतला .दुसऱ्या दिवशी सुनबाईनी काकुनी जी डिश बनवली ती स्वतः बनवली ती खाली आणि भरलेली प्लेट आणि रिकामी प्लेट  त्याचा फोटो facebbok वर शेयर केला आणि मला टॅग केले .

वा !!काकूंना आनंद झाला की सुनेने बनवून का होईना खालले ,सुनेला आनंद झाला आता सासूबाई परत कोणाला पाठवणार नाही  मलाही आनंद झाला खाली प्लेट का होईना पण त्यात मला टॅग केले .social media वरचे एक टॅग माझ्या नावाने ऍड झाले . 

कागदाची युनिव्हर्सिटी

 माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच  जणू या कागदातूनच विविध वळणे घेत घेत पार पडतो आहे . ह्या अक्षरांच्या आणि अंकाच्या सुबक भासणाऱ्या रस्त्यावरचे  पहिले वळण म्हणजे पहिली ते दहावी.   ह्या वळणावर प्रत्येक  वर्गाची  गुणपत्रिका  आणि विविध स्पर्धा परीक्षेचे प्रमाणपत्र ही  जमा पुंजी एकत्र  करत  मुक्काम पुढे जात होता. हे बालपणीचे विश्व खूप छान भासत  होते  सगळीकडे कौतुकाचा पाऊस होता , नातेवाईकांकडून कागदाच्याच  बक्षीसाची शाल पांघरली जात होती आणि सुट्टींमधील विविध शिबिरांचे प्रशंसापत्र ह्याची प्रचिती म्हणजे जणू काही उन्हाळ्यात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसेच! असे हे तिन्ही ऋतूंचे बालपण लवकरच सरले  . बारावीचा निकाल लागला पुस्तकांच्या  पानांवरील बारीक  बारिक अक्षरांमधुन वळण घेत "करिअर" ह्या रस्त्यावरचा टप्पा सुरक्षित पार पडला होता .म्हणून आईने  एका कागदावर छापून आलेल्या  अंकांसाठी   चिवडा , पेढा आणि  मटकी ह्याची पार्टी दिली तेही कागदी प्लेट मधूनच !अशी  आमची सोबत ऐन रंगात आली होती माझी कागदाला आणि कागदाची मला .

 इंजिनीरिंगला प्रवेश मिळाला दुसरे वळण सुरु झाले ,रस्ता थोडा अवघड होता.पण कागदाशिवाय पर्याय नव्हता. आमची सोबत  सबमिशन, जर्नल्स, पेपर्स आणि पुन्हा गुणपत्रिका अशी पूर्ण होत गेली. खरंच चार वर्षाचा तो प्रवास कागदाशिवाय अपूर्णच होता. 

 रस्ता संपत नव्हता ,प्रवास सुरूच होता.  दिवसांचे रकाने भरत ,चाकोरीचे कागद रंगवले  जात होते .
रस्त्यावर तिसरे वळण आले नागमोडीच ते. अनुभवांची साठवण कागदांसोबत  होतीच कागद कागद खेळता खेळता कागद हा  आयुष्याचा अविभाज्य भाग बनून बसला.  M.E चा कागद अक्षरशः स्वप्नांची पूर्तता होऊन पदरात पडला. 

अखंड फाईल मधून जाणारा हा प्रवास मुक्कामावर पोहचणारच होता . हाकेच्या अंतरावर Ph.D ची पदवी असतांना हा अंगवळणी पडलेला कागदांचा रस्ता अचानक बदलायला युनिव्हर्सिटी ने मजबूर केले  . कोरोना मुळे  एक नवीन क्रांती शिक्षण क्षेत्रात सुरु झाली होती .प्रत्यक्ष न येता कागद  डिजिटल रूपाने  जमा करण्याची पद्धत सुरु झाली होती .  

 डिजिटल मार्ग पत्करणे हे मलाच नव्हे तर टेबल वर  फाईलचा गठ्ठा जमा करून मागे  बसणाऱ्या  युनिव्हर्सिटी मधील प्रत्येकाला अनोखा होता . फाईल मध्ये दबून  गेलेली चष्म्याची चौकडी आता कॉम्पुटर  वर स्थिरावली होती .क्लिक करुन  सगळं काही साच्यात बसवू पहात होती . बाहेरूनच ग्रीन दिसणारी युनिव्हर्सिटी आता खऱ्या अर्थाने आतमधून सुद्धा गो ग्रिन होणार होती  . 

काहीहीअसो ही शेवटची पदवी डिजिटल रूपाने समोर येईल आणि कागद म्हणजेच सगळं काही असं मानणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य लोंकाना कागदवाचूनहि सगळं निभावत ह्याची जाणीव होईल .
बालपणात निरागसपणे भेटलेला कागदाला स्वार्थी पणाचा वास कधी चिकटला कळलंच नाही.

सक्षम साठी होमस्कूलिंग चा पर्याय निवडताना हाच विचार आला, प्रशंसापत्र ह्या रूपाने कागदाशी मैत्री न करता तोच कागद मोरपीस बनून आला तर आयुष्य सुंदर होईल.

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...