Thursday 2 November 2017

माझी आजी ......... एक ठसठशीत व्यक्तिमत्व


आमची आजी म्हणजे शांताबाई ओंकारदास चवरे . माझ्या आईची आई . माझं बालपण आजीच्याच संगतीत गेलं म्हणून तीच व्यक्तिमत्व फार जवळून बघायला मिळालं. आजी म्हणजे  वडाच्या खोडासारखी मजबूत बुंधा असलेली आहे .तिच्या सावलीत आम्ही सगळे भावंडं मोठी झालो. तिची मुले मुली म्हणजे वडाच्या झाडाला असलेल्या पारंब्याप्रमाणे  आहे . ५मुली २ मुले एवढा मोठा पसारा या वडाच्या झाडाचा आहे .आजीने आयुष्यात बरच काही पहिल. नातवंडाची मुलं बघायला मिळालेली माझी आजी वयाच्या ८७ वर्षी देखील ठणठणीत आहे. एक प्रकारचा प्रचंड शहाणेपणा आणि समजूतदारपणा तिच्याकडे होता. खूप भयंकर अनुभव तिच्या समोर आले पण आजीने कधीच मान टाकली नाही . हे तीच जगण्यावरच प्रेम होत की  जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे लक्षात आल नाही पण आजोबा असूनही त्यांची पाहिजे तशी साथ आजीला संसाराचा गाडा ओढताना मिळाली नाही. सगळा गाडा तिने एकटीनेच ओढला,आपण जर काही केलं नाही तर मुले रस्त्यावर येतील हे जाणून तिने जगायचं थांबवलं नाही किंवा कोणी मदतीला येईल याची वाट पहिली नाही. पदर खोचून कमी वयात कर्तबगार झाली. आजच्या काळातलं वातावरण जर आजीला मिळालं असत तर ती कुठल्या कुठे गेली असती. पण तिची ही मेहनत मात्र मुलांना उभी करण्यात दिसली. 
आजीचं मुळच माहेर  अचलपूर अमरावती जिल्ह्यातील , भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हाचा  तिचा जन्म ,घरातील परिस्थितीमुळे आजीला कारंजा येथील कंकूबाई आश्रमात शिकायला ठेवले. आजीचं शिक्षण १० वि पर्यंत झालं . लगेच आजीला जिल्हा परिषदच्या शाळेत नोकरी मिळाली होती . तीच व्यक्तीमत्व देखील शिक्षिका म्हणून शोभून दिसत होत . आजी  दिसायला विलक्षण तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यवरच तेज आजही अंगावर आलेल्या सुरकुत्या मधून  झळकत. आजोबानी आजीला पाहताच क्षणी पसंत केलं होत हे आजोबांकडूनच ऐकलेलं आठवत . एका ठराविक लयीमध्ये आजोबा आजीला "मास्तरीण बाई SSSSS " म्हणून हाक मारायचे. आजी कायम नऊवारीत दिसायची आता मात्र अघळ पघळ गाऊन घालते पण कोणी बाहेरचे लोकं  आले कि तिची पदर सावरण्यासाठी घालमेल होते.
अंघोळ करून झाली की  तीच वेणी फणी करून लांबसडक केसांचा रिबन लावून अंबाडा पाडणं  ,आणि कपाळावर ठसठशीत कुंकू अजूनही स्मरणात आहे. आता मात्र कुंकूंची जागा टिकलीने घेतली तेवढाच काय फरक बाकी अजूनही सगळं जसच्या तस. तिची एक संदूक होती लोखंडाची त्याला कायम कुलूप  असायचं,त्याची चाबी तिच्या गळ्यात एका काळ्या दोराला अडकवलेली असायची ,आम्हा भावंडाना कायम उत्सुकता असायची कि यामध्ये काय बर असेल?एकदा पेटी उघडायचा मला मौका मिळाला तिच्या हिशेबाच्या वह्या,पेन्सिल,रब्बर,गळ्यातील पोत ,एका वहीमध्ये पैसे अस बरच काय काय कामाचं आणि बिनकामाच सगळंच असायचं . हि सवय तिला आश्रमात असल्यापासून  होती . आजोबा पंडित होते ते कायम फिरस्तीवर असायचे . त्यामुळे सगळंच आजीला करावं लागायचं.तिची खूप ओढाताण व्हायची . ज़िल्हा परिषद ची नोकरी असल्यामुळे तिच्या सारख्या बदल्या व्हायच्या ,नवीन ठिकाणी घडी बसायला वेळ लागत होता . पण तिने सगळंच धीराने केलं . समाजात मिसळणं , लग्नाला जाणे,आला गेला पै पाहून बघणे यामध्ये तिला खूप उल्हास नव्हता . परिस्थिती पण तशी नव्हती. सगळ्यात  पहिली गरज तिला मुलांचे पालनपोषण करणे ही होती .  नोकरीमध्ये पण आजी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली , तिचा शाळेमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये आणि घरीही धाक होता. आम्ही नातवंड सुद्धा आजीच्या एका आवाजात गपगार व्हायचो . आजोबा सुद्धा आजीचा आवाज वाढला कि शांत बसलेले मी पाहिलंय . नशीब ,प्राक्तन,देव हे शब्द मी कधी आजीच्या तोंडून ऐकले नाही. फार देव देव करणं तिला आवडायचं नाही ,तिचा विश्वास आपल्या पुरुषार्थावर आहे.चांगले वागणे म्हणजेच देवाची पूजा आहे असा ती म्हणायची , दणकून कष्ट करावे ,ह्यावर तिचा विश्वास आहे. तिच्या नातवंडांना परीक्षेत कितीही मार्क पडू देत ती आवर्जून पेढे आणायला लावायची . आजीची पेंशन काढायला मी रिक्षात तिला घेऊन जात असे . तिकडून येताना मला नेहमी खाऊ मिळायचा ,आता आजीचं वय झालाय ,तिची स्मरणशक्ती खूप कमी झालीय पण मधेच तिला जुन्या गोष्टी आठवतात . माझी मोठी मावशी म्हणजे तिची मोठी मुलगी आणि जावई दोघेही आता या जगात नाही ,पण शरयू कडे जायचं असे ती  बरेचदा म्हणते. आम्ही सगळे नातवंड जमलो कि तिला आनंद होतो ,आम्ही तिथेच राहावं असा तिला कायम वाटत ,माझं लग्न झालाय हे सुद्धा ती बरेचदा  विसरते. एक मजेशीर प्रसंग मला आठवतो, आईच्या दूरच्या नात्यातला एक व्यक्ती एकदा घरी आला होता,त्याचे चारित्र्य  तरुण असताना चांगले नव्हते (आजीच्या भाषेत लंपट ) पण साधारण त्याचे वय ४२ वगैरे असेल तेव्हा तो घरी भेटायला आला होता . पण आजीच्या डोक्यात अजूनही जुन्या आठवणी असतील त्याच्याबद्दलच्या , आईला आजीने त्याला बाहेर काढ म्हणून सांगितले,पण एक्दम कोणाला जा म्हणून कस  सांगणार म्हणून आई विचार करत होती , आई बाहेर काढत नाहीय म्हणून आजी तिची काठी टेकवत बाहेर आली ,आणि त्या बिचाऱ्या व्यक्तीला घालून पडून बोलून हाकलून लावलं . आता तो तसा नसेलही पण आजीच्या   जुन्या आठवणीतुन तो विसरल्या गेला नव्हता . आम्हाला मात्र तोंड लपवायला जागा नव्हती. आजीचा एक भाऊ न चुकता भाऊबीजेला ओवाळायला  येतो,तेव्हा आजीच्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या मी पाहिलंय . ,तिच्या या आग्रही स्वभावानं माझे मामा ,आई,मावशी सगळ्या उच्च  पदावर नोकरी करू शकत आहे,तेव्हा जर आजीने मूलं  आणि मुलींना  बाहेर पडू दिल नसत तर आज त्यांनी इतकी प्रगती केली नसती. समाजात अंधश्रद्धा असताना  देखील आजीचे विचार बुरसटलेले नव्हते. तिने यासाठी बऱ्याच लोकांचा वाईटपणा ओढवून घेतलाय. .कसलं आणि कुठून आलेलं शहाणपण तिच्याकडे होत ठाऊक नाही पण कोणी आजीचं ऐकलं नाही असा कधी झालं नाही . 
आजोबा गेल्यानंतर देखील तिने स्वतःला सावरलं. आज तीच शरीर कृश झालाय,असंख्य सुरकुत्यांनी व्यापलाय ,पण स्वतःच स्वावलंबीपण मात्र अजूनही तसाच आहे. तिच्या भिंगाच्या चष्म्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अजूनही मोहवून टाकतो . म्हणून आजीवर लिहण्याचा माझा हा प्रयास!!!  
  




Tuesday 31 October 2017

परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .

माझा मुलगा सक्षम सध्या वय वर्षे ३.५. तो ३ वर्षाचा झाला तेव्हा इतर आईप्रमाणे माझ्याही डोक्यात विचार सुरु झाले त्याच्यासाठी शाळा कुठली निवडायची? मित्र मंडळीत शोभेल आणि जास्तीत जास्त स्टडी ओरिएंटेड हाय स्टेटस स्कूल,वेल सेटल ,फ्रेंडली इन्व्हॉर्नमेंट ,भरपूर ऍक्टिव्हिटी जिथे हे सगळं उपलब्ध असेल अशी शाळा निवडण्यामागे माझा कल  होता . म्हणून सगळ्या शाळांना भेट देऊन झाली . पण मन त्या कोवळ्या जीवाला शाळेत पाठवायला राजी होत नव्हतं .  रोजच्या वेळेत शाळेत जाऊन दिवसांचे रकाने भरणे ,इतिहास ,भूगोल,गणित मार्क पाडण्यासाठी वाचणे . मातृभाषेत न बोलता इंग्लिश मधेच संभाषण करणे हे सगळं मला करायला भाग पडणार होत.कारण मुलाला ग्लोबल बनवायचं असेल तर हे सगळं त्याच्याकडून हळुवारपणे ,त्याच्या कलाने आणि नाही ऐकलं तर दमदाटी करून करूनच घ्यावं लागणार होत . पण हे करून माझा मुलगा खरंच ग्लोबल होईल का ?ग्लोबल ह्याची व्याख्या एका जापनीज माणसाने सुंदर     शब्दात मांडली आहे  आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळ  नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णू दृष्टीने समजावून घेणे म्हणजे ग्लोबल ...... त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही  पण अनुकरणाचा नाही तर समजावून घेण्यासाठी .जर तुम्हाला  स्वतःच्या मातृभाषेतील साहित्यच जर नीट वाचता येत नसेल  तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजावून घेणार?आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल  कसे होणार ? पण या न थांबणाऱ्या स्पर्धेमध्ये माझा मुलगा मागे पडायला नको , ह्या सगळ्या पिएर प्रेशर मधून मी जात होते. एका हाय स्टॅंडर्ड शाळेमध्ये शिक्षक -पालक सभा ला हजेरी लावली ,शिक्षकांच्या छोट्या मुलांकडून केल्या जाणाऱ्या आभाळाएवढ्या अपेक्षा ऐकून मन खिन्न झालं. हे जर माझ्या मुलाला जमल नाही तर हे शिक्षक  त्याच्या कडून करवून घेणार याची शाश्वती ते पालक लोकांना देत होते. पण ह्या सगळ्यामध्ये त्याच बालपण कोमेजून जाईल ,कुठलीही गोष्ट ठरवून दिल्या गेलेल्या साच्यातच झाली पाहिजे ह्याच दडपण मनावर असेल.  आणि सक्षमचा  निरपराध चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरंगू लागला . तो ह्या सगळ्यापासून अनभीज्ञ होता . तिथून निघाल्यावर या शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या शाळेला दुसरी वाट आहे का याचा शोध सुरु झाला . माझ्या नवऱ्याच्या डोक्यात हा विचार त्याच्या जन्मापासूनच सुरु होता .पण हे सगळं आपल्याला झेपेल का याचा अंदाज येत नव्हता .  शाळेला न दाखल करता त्याला शिकवण्याचा  आणि हो खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याचा काही पर्यायी रस्ता आहे का??फक्त पैसे आणि उच्च जीवनशैली मिळेल  हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण देणं हे कितपत योग्य आहे हा विचार करून "सक्षमला शाळेत न पाठवणं "हा आम्ही दोघांनी  एक मतांनी घेतलेला निर्णय आहे. तिथूनच  आमचा होमस्कूल कडे वळण्याचा  प्रवास सुरु झाला. 
त्याच दरम्यान होमस्कूल ,अनस्कूल ,अल्टर्नेट स्कूल असे तीन पर्याय आमच्या समोर होते. होमस्कूल म्हणजे NIOS किंवा IGCSE  सारख्या बोर्डचा पाठ्यक्रम घरून पूर्ण करणे आणि परीक्षा देणे. तसेच अनस्कूल म्हणजे कुठलाही पाठ्यक्रम न  शिकवता नैसर्गिक पद्धतीने मुलाने शिकणे आणि आपण त्यात फक्त एक माध्यम बनणे आणि पर्यायी शिक्षण पध्दती म्हणजे ज्या शाळेमध्ये ठराविक अभ्यासक्रम न शिकवता, मुलांच्या कलेने आणि काही विशिष्ठ पद्धतीने (जसं की waldorf method) शिकवल्या जातात. आम्ही सध्या तरी सक्षम साठी होमस्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उर्मिला स्यामसन, ३ मुलांची होमस्कूलर (किंवा unschooler म्हणा हवं तर ) आई ह्यांच्याशी भेट झाली ( माझ्या नवऱ्याने घडवून आणली ). आणि पुण्यात तुमच्यासारखे विचार करणारे २५० पालक आहेत जे आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत (आणि काही असेही आहेत जे अगोदर पाठवत होते आणि आता ते शाळेतून काढून घेत आहेत) हे सांगितल्यावर ऐकून खूप बरं वाटलं. त्या ग्रुप मध्ये आम्हीही सहभागी झालो. आम्ही महिन्यातून एक किंवा दोन वेळा भेटतो. एकमेकांसोबत विचारांची देवाण घेवाण होते. आता लोकांना वेगळा वाटणारा आमचा निर्णय हा आमच्यासाठी मात्र सहज होता. "काहीतरीच काय" ह्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही सोडून दिल. आम्ही सगळे मिळून शिकतो, कारण आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो, जगातील सुंदर वाटणाऱ्या गोष्टी पडताळून बघायला आवडतात इतकेच उत्तर मी देते. असच सक्षमला घेऊन एका "होम स्कूल co -opp" ला गेले होते. साधारण ३ ते १० या वयोगटाची मुले आणि त्यांचे पालक तिथे जमले होते. एका कॉफी जार कॅफे मध्ये आम्ही भेटलो. कॅफे चालवणारी लिसा ही सुद्धा एक होम स्कूलर मुलांची आई आहे. त्यामुळे तीची जागा आम्ही महिन्यातून एकदा भेटण्यासाठी वापरतो. जे शिक्षण शाळेत मिळूच शकत नाही अस exposure मुलांना मिळतं. कुणाचा धाक नाही, वेळेचं बंधन नाही, अभ्यासाचे ओझे नाही, कुणासोबत स्पर्धा नाही आणि मार्कांचा आकडा नाही. स्वछंद सोडल्या नंतर मुलांमध्ये किती प्रतिभा आहे हे लक्षात येत. एका टेबलवर भरपूर कलर्स अक्षरशः सांडलेले होते सगळ्यांना एक एक कोरा कागद देण्यात आला. पाहिजे ते साहित्य उचला आणि आपली कला दाखवण्यास त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. अप्रतिम चित्र मुलांनी आपापल्या क्षमतेनुसार रेखाटली. "असच" करायला पाहिजे हे सांगणार त्यांना कोणी नव्हतं. साच्यातली चित्र त्यांनी काढली नाही. त्यामुळे एकही चित्रात गवत खाणारी गाय किंवा दोरी खेळणारी मुलगी दिसली नाही. दिसले ते थ्रीडी अँगल ने मुलांनी कल्पना केलेले चित्र. त्याची तुलना होऊच शकत नाही. हाताची बोटे वापरून सुंदर निसर्ग चित्र रेखाटल्या गेले. यावरून एकच लक्षात आले मुलांना जर मदत करायची असेल तर एवढंच करा कि "त्यांना कुठलीच मदत करू नका ". हे घोड्याचं चित्र आहे हे त्यांच्या मानस पटलावर बिंबित करण्यापेक्षा, जेव्हा खरंच घोडा त्यांच्या डोळ्यसमोर येईल तेव्हा त्याला आलेली अनुभूती ही  कायम त्याच्या स्मरणात राहील. हे ज्ञान कायमस्वरूपी असत एक उदाहरण द्यायचं झालं तर या ग्रुप मध्ये माझ्यासारखीच एक आई मला भेटली, ती एक उत्तम चित्रकार आहे सुंदर पैंटिंग्स तिने बनवलेले आहे, तिचा मुलगा वय वर्ष १०-१२ असेल, त्याने तिच्या पैंटिंग्सला भारतातच नाही तर विदेशात सुद्धा एक उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, गूगल हे माध्यम वापरून  जे एका एम बी ए मार्केटिंग वाल्याला सुद्धा जमल नसत. 


असच खेळण्याच्या बाबतीत सुद्धा आढळत . आधी मी १० दिवसातून एकदा खेळण्याच्या दुकानाला भेट द्यायचे आणि विशेष वेगळे वाटणारे खेळणे हे मी सक्षम साठी निवडायचे . उच्च किमतीचे ,ब्रॅण्डेड खेळणे निवडण्यामागे माझा कल होता . पण काही दिवसात तो त्या खेळण्यांना कंटाळून जातो .  हळूहळू लक्षात आले आपण त्याला हातात खेळणे देऊन त्याच्या creativity वर बंधन घालतोय .  म्हणून एक नवीन प्रयोग सुरु केला घरात जे खोके ,प्लास्टिकचे बॉक्सेस ,चमचे , टाकाऊ सामान आहे आम्ही त्यातून वेगवेगळे निर्मिती करू लागलो . आणि कुणाचा विश्वास बसणार नाही अशा युक्त्या मला त्याच्याकडून ऐकायला मिळतात . रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम हा कसा डायव्हर्ट होतो हे त्याने मला प्रयोग करून दाखवले . तेव्हापासून शॉपिंग मॉल मध्ये जाऊन माझे ब्रँडेड खेळणे आणणे बंद झाले. मुलांची निसर्गाशी फार लवकर मैत्री होते . पण आजकालच्या शहरी वातावरणात आपण मुलांना कृत्रिम जगाशी ओळख करून घेण्यास भाग पाडतो .माझ्या मुलाला  सामाजिक जाणीव असली पाहिजे हि पालकांची अपेक्षा फोल ठरते .झाड ,नदी,डोंगर , जंगल ,प्राणी ह्यांच्याशी मुलांची लवकर मैत्री होते . कारण त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे वाटतात . नैसार्गिग घडणाऱ्या गोष्टींकडे मुलांचं आकर्षण असत. आपण मात्र ready made knowledge मुलांना देतो .



म्हणून मला एक नवीन पैलू जाणवतोय . स्वतः एक प्राध्यापक असून ,असं वाटत पुस्तकी ज्ञान तर मी खूप मिळवलं ,पण सक्षमसोबत परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .   

जर अस झालं तर मजेत जगता येईल 
जेव्हा घर म्हणजेच  माझी शाळा होईल  

आजी, आजोबा, आई आणि बाबा हेच माझे गुरु 
ह्या चौघांसोबत शिक्षण होईल माझं सुरु 

मार दिला तरी आवडेल, मला तुमचा  धाक 
शाळेतल्या छडीपेक्षा चालेल तुमचा राग  

पुस्तक आणि दप्तराचे ओझे नको पाठीवर 
गिरवूया सुरेख अक्षरे अनुभवांच्या पाटीवर 

मला आवडेल तो विषय दोघे मिळून शिकू 
मदतीला वाटल्यास गुगलला घेऊ 

चौकटीच्या बाहेर जरा जाऊन तर पाहू 
निसर्गाच्या विद्यापीठात शिकून सगळं घेऊ 

स्पर्धा मात्र माझी स्वतः सोबतच असेल 
माझा अभ्यास घड्याळीच्या ठोकावर नसेल 

मित्रांची संगत पण मी निराळीच ठेवेल 
वॉचमन काकां, बाजूचे आजोबा यांना पण मित्र बनवेल  

इतिहासातल्या शिवाजीला सिंहगडावर जाऊन भेटू 
भूगोल शिकण्यासाठी आपण देशाटन करू 

चित्र रेखाटेल मी माझ्या कल्पनेतून 
हवं तस साकारेल माझ्या कुंचल्यातून 

आयुष्याच्या पोस्टर मध्ये  सुंदर रंग आपणच भरुया 
संगीताचा ठेका   पावसाच्या थेंबासोबत धरूया 

स्वयंपाकघरात निराळे प्रयोग आपण करूया 
यूट्यूब वरून  नवीन रेसिपी करायला शिकूया 

अस झालं तर सगळंच कसं छान  होऊन जाईल 
स्वछंद पाखरासारखं उडून बघता येईल 
शाळेची गंमत मला जाणून घेता येईल

Tuesday 19 September 2017

कहानी वाला गांव आज बिना खोजे ही मिल गया


पर्युषण पर्व जैन लोगोंका सबसे महत्वपूर्ण पर्व कहलाता है. ये आत्माकी शुद्धि का पर्व है.  इन दिनों में सिर्फ मानव ही नहीं प्रकृति  भी बहोत खुश होकर झूमने लगती है . हम शहरी लोगों के लिए ये पर्व तो कुछ खास मायने रखता है. हम अपने भोगविलास में इतने रचपच गए है की ये पर्युषण पर्व, एक मौका है हमारे असली रूप को पहचानने का, अपनी आत्मा की और देखने का. इसीलिए हम प्रयास करते है के पर्युषण, निर्ग्रन्थ गुरुओं के सान्निध्य में हो और वह भी ऐसे गुरु जो पंचमकाल में भी चतुर्थकाल जैसी चर्या और साधना में लीन हो - परम पूज्य १०८ श्री विनीत सागरजी एवं परम पूज्य १०८ श्री चन्द्रप्रभ सागरजी।

इस बार के चौमासे में वे मुनिराज राजस्थान प्रांत के बोराव नामक एक छोटेसे गांव में विराजमान हैं. हमारा तय था के महाराजजी जहाँ होंगे वहा जाना है, यहाँ पुणे से हर चौमासे में करीब १५-२० लोग चौका लेकर जाते हैं, उनके साथ हम भी निकल पड़े. अनजान इस बात से के एक ऐसा अनुभव साथ लाएंगे जिसे शायद जिंदगी भर भुला नहीं पाएंगे.

बहुत बार ये सोचते थे की आदर्श जीवन कैसा होना चाहिए ,"एक गांव है जहा सब लोक मिलजुल के रहते है , गांव में एक नदी है आजुबाजु खेत है ,खेत का पका हुआ अनाज घर में आता है जो की रसायनो से परे है, घर में भी  बड़ो का आदर होता है, सुबह शाम भगवान की भक्ति होती है, जहा अपनी धर्म और संस्कृति बहुत नजदीक से देखने को मिलती है " ये सब अब तक कहानी में सुना था. लेकिन अपने कानों पर और अपने आखों पर विश्वास न बैठे ऐसी जगह का पता वर्तमान में पता चला है उस गांव का नाम है "बोराव". 

गूगल मैप पे ढूंढोगे तो दीखेगा नहीं, क्यूंकि शायद देवों के द्वारा बसाया गया हो ऐसा लगे और शायद शहर वाले लोग यहाँ जाके गन्दगी न फैलाये इसीलिए दीखता नहीं हो. हम भी ऐसा ही सोच के  गए थे पता नहीं कहा जा रहे है ? इतना छोटा गांव पर्युषण की व्यवस्था होगी भी की नहीं ?  इतना बस पता था की परमपूज्य श्री १०८ विनित सागर जी और परमपूज्य श्री १०८ चन्द्रप्रभु सागर जी महाराजी का सानिध्य मिल जाये तो पर्युषण सफल हो जाये. लेकिन मन में थोडीसी आशंका थी. हमारा कुछ ऐसा हुआ पुणे से नागदा जंकशन सुबह ६:०० बजे पहुंचे और वहां से कोटा करीब ११ बजे पहुँच गए. कोटा में एक करीबी रिश्तेदार के यहाँ नाह धोके, भोजन किया और  दोपहर २ बजे गाड़ी मिलेगी ऐसा सोच कर धुप में २ घंटे इंतजार करते रहे लेकिन गाड़ी तो दूर कोई साधन नहीं मिला. रावतभाटा होके सिंघौली की गाड़ी पकड़ली और २ गाड़िया बदलते हुए बोराव पहुंच गये. हम शहरी लोगों को सब इंस्टेंट मिलता है इसीलिए संयम जल्दी छूटता है. और शाम को ६ बजे बोराव पहुंच गए. कहा आके पड़ गए ये सोच बनी हुई थी. लेकिन ये असली जन्नत है ये बादमे पता चला. लेनेके लिए लोग पहले ही पहुंच चुके थे. शाम की भोजन की व्यवस्था बन चुकी थी. महाराज जी के दर्शन के बाद मन थोड़ा हल्का हुआ. हमारा सामान दो बुज़ुर्ग लोगों ने (कोई कर्मचारी नहीं बल्कि श्रावक थे वहां के ) उठा के सही जगह पंहुचा दिया और हमें पता भी नहीं चलने दिया. मेरी चप्पल भी जब उठा के पंहुचा दियी तब हम शहरी लोगों का मान मिट्टीमे मिल गया. आज तक यही समझा था हम जैसी व्यवस्था छोटे गांव वाले नहीं कर सकते है पर ये तो शुरूवात थी. 

हम करीब १६ लोग पुणे से चौका लेके गए थे. और इतने लोगोंकी व्यवस्था कोई अपने घर पे एक नहीं दो नहीं पुरे दस दिन कर रहा है और वो भी कोई हिचकिचाहट न रखते हुए ! हम लोग दस बार सोचेंगे?? कही अपना घर ख़राब न कर दे !! बहुत छोटी मानसिकता है बड़े बड़े शहरवालों की !!!


ऊपर के नए दो कमरे हमारे रहने के लिए और बड़ा हॉल चौका के लिए दिया था . बर्तन तो उनके खुद के घरके थे . जितने बड़े बड़े थे सब हम लोगों केँ लिए दे दिए, बिना गिने ही. अपने परिवार वालों को गिनके बर्तन देने वाले हम उनके लिए तो अनजान लोग ही थे. हमने जो द्रव्य (गेहूं, दाल, इत्यादि ) लाया था वो वैसा के वैसा रखना पड़ा, खेत के गेहू, सब्जी, फल सबकी तैयारी कर के दी थी. यहाँ तक की दूध  भी अपनेही घर का और खुद घर की महिलाओं ने निकला हुआ. यहाँ की महिलाये, पुरुष, बेटियां और बहुएँ घर का सारा काम (झाड़ू पोंछा, बर्तन मांझना, बोझा ढोना) खुद ही करते है. इन कामों के लिए इनके यहाँ कोई सेवक नहीं आते. जिससे इनका स्वावलम्बन अभीभी टिका हुआ है.  


"अतिथि देवो  भव " क्या और कैसे होता है ये  वहां जाकर पता चला. अपनी संस्कृति और धर्म को इन लोगोने बड़ी अच्छी तरह बचाके रखा है. महिलाओ की मर्यादा और पुरुषोंकी सादगी को यहाँ जतन करके रखा है. इस गांव की एक और ख़ासियत ये है की, इस भौतिकतावादी युग में भी यहाँ की बेटियों के पास अपना खुद का मोबाइल नहीं है. उन्हें जबभी कोई जरुरत होती है तो अपने पिता या भैया का मोबाइल इस्तेमाल करती हैं और तुरंत लौटा देती है. छोटे बच्चों से लेकर बुजुर्ग तक सभी लोग अभिषेक, पूजा एवम स्वाध्याय में दिखाई देते है. मंदिरजी में सुबह की संगीतमयी पूजन के लिए, या संध्या की भक्ति के लिए किसी बाहर के संगीतकार की कोई आवश्यकता ही नहीं. यहाँ कोई भाई गाता है तो कोई ढ़ोल बजाता है और कोई अपनी उँगलियों का जादू पियानो पर चलता है. महाराजजी के आहार के बाद ढ़ोल, ताशे और बाजे की जयजयकार में महाराजजी का मंदिरजी तक विहार कराने वाले भी छोटे छोटे श्रावक। ऐसा लगता था के जैसे चतुर्थ काल के मुनियों को चतुर्थ काल का ही भारत और चतुर्थ काल के ही श्रावक मिल गए हो चौमासा के लिए. केवल ३०-३५  जैन घर होते हुए भी सभी इतनी उत्तम व्यवस्था यहाँ देखि गयी.

महाराजजी के आहार होने के बाद जब हम अपने चौकें में जाने लगते तोह कोई न कोई आकर हम में से कुछ लोगों को अपने चौके में भोजन के लिये आग्रह कर के ले जाता और खाने खिलाने के मामले में तो वैसेभी राजस्थान बहोत प्रसिद्ध है. 

शहर से दूर होके भी किसीभी चीज़ की कमी महसूस होने नही दी. और जीवनभर के लिए एक पाठ हम शहरवासियो के लिए पढ़ा दीया. 



 कहानी वाला गांव  आज बिना खोजे ही मिल गया, 
चतुर्थ कालीन चर्या कैसी होगी इसका पता लग गया,
गांव में सुन्दर बह रही है ब्राम्ही लेके अपना पानी,
गांव का बच्चा बच्चा जाने जिनवाणी,
सब काम खुदसे करते है न सेवक लगे न नौकरानी,
अनाज उगायें खेतों में, और गाय के दूध की गंगा नहायी,
औरते चलती है सिर ढकके और पुरुष रखे पोशाख में सादगी,
आज भी सब साथ साथ चल रहे है लेके अपना धर्म और संस्कृति,
हम शहरवालों को अब तक नाज़ था लेके अपनी दुनियादारी,
आधुनिकता से भरा जीवन और ढेर सारी पैसोंकी कमाई,
बोराव जाके पता चला क्या है सच्ची जिंदगानी,
न पैसा साथ आएगा न ये सुखोंकी चटाई,
साथ लेके जाओगे वो है धर्म ने दी हुई सिखाई,


सब नाज़ वही के वही उतर गया ....
कहानी वाला गांव  आज बिना खोजे ही मिल गया 

Wednesday 13 September 2017

अनुभवातून गिरवलेला धडा

आज सक्षमला  घेऊन एका होम स्कूल co -opp ला गेले होते. साधारण ३ ते १० या वयोगटाची मुले आणि त्यांचे पालक तिथे जमले होते . एका कॉफी जार कॅफे मध्ये आम्ही भेटलो . कॅफे चालवणारी लिसा ही सुद्धा एक होम स्कूलर मुलांची आई आहे . त्यामुळे तीची जागा आम्ही महिन्यातून एकदा भेटण्यासाठी वापरतो . जे शिक्षण शाळेत मिळूच शकत नाही अस exposure मुलांना मिळतं . कुणाचा धाक नाही, वेळेचं बंधन नाही,अभ्यासाचे ओझे नाही ,कुणासोबत स्पर्धा नाही मार्कांचा आकडा  नाही  . स्वछंद सोडल्या नंतर मुलांमध्ये किती talent आहे हे लक्षात येत . एका टेबलवर भरपूर कलर्स अक्षरशः सांडलेले होते सगळ्यांना एक एक कोरा कागद देण्यात आला . पाहिजे ते साहित्य उचला आणि आपली कला दाखवण्यास त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. अप्रतिम चित्र मुलांनी आपापल्या क्षमतेनुसार रेखाटली. असच करायला पाहिजे हे सांगणार त्यांना कोणी नव्हतं . साच्यातली चित्र त्यांनी काढली नाही . त्यामुळे एकही चित्रात गवत खाणारी गाय किंवा दोरी खेळणारी मुलगी दिसली नाही. दिसले ते ३d अँगल ने मुलांनी कल्पना केलेले चित्र . त्याची तुलना होऊच शकत नाही . हाताची बोटे वापरून सुंदर निसर्ग चित्र रेखाटल्या गेले . यावरून एकच लक्षात आले मुलांना जर मदत करायची असेल तर एवढंच करा कि "त्यांना कुठलीच मदत करू नका " . हे घोड्याचं चित्र आहे हे त्यांच्या मानस पटलावर बिंबित करण्यापेक्षा , जेव्हा खरंच घोडा त्याच्या डोळ्यसमोर येईल तेव्हा त्याला आलेली अनुभूती ही  कायम त्याच्या स्मरणात राहील . हे ज्ञान कायमस्वरूपी असत. 

असच खेळण्याच्या बाबतीत सुद्धा आढळत . आधी मी १० दिवसातून एकदा खेळण्याच्या दुकानाला भेट द्यायचे आणि विशेष वेगळे वाटणारे खेळणे हे मी सक्षम साठी निवडायचे . उच्च किमतीचे ,ब्रॅण्डेड खेळणे निवडण्यामागे माझा कल होता . पण काही दिवसात तो त्या खेळण्यांना कंटाळून जातो .  हळूहळू लक्षात आले आपण त्याला हातात खेळणे देऊन त्याच्या creativity वर बंधन घालतोय .  म्हणून एक नवीन प्रयोग सुरु केला घरात जे खोके ,प्लास्टिकचे बॉक्सेस ,चमचे , टाकाऊ सामान आहे आम्ही त्यातून वेगवेगळे निर्मिती करू लागलो . आणि कुणाचा विश्वास बसणार नाही अशा युक्त्या मला त्याच्याकडून ऐकायला मिळतात . रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम हा कसा डायव्हर्ट होतो हे त्याने मला प्रयोग करून दाखवले . तेव्हापासून शॉपिंग मॉल मध्ये जाऊन माझे ब्रँडेड खेळणे आणणे बंद झाले. मुलांची निसर्गाशी फार लवकर मैत्री होते . पण आजकालच्या शहरी वातावरणात आपण मुलांना कृत्रिम जगाशी ओळख करून घेण्यास भाग पाडतो .माझ्या मुलाला  सामाजिक जाणीव असली पाहिजे हि पालकांची अपेक्षा फोल ठरते .झाड ,नदी,डोंगर , जंगल ,प्राणी ह्यांच्याशी मुलांची लवकर मैत्री होते . कारण त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे वाटतात . नैसार्गिग घडणाऱ्या गोष्टींकडे मुलांचं आकर्षण असत. आपण मात्र readymade knowledge मुलांना देतो .
म्हणून मला एक नवीन पैलू जाणवतोय . पुस्तकी ज्ञान तर मी खूप मिळवलं ,पण सक्षमसोबत परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .   

Monday 14 August 2017

स्वतंत्र भारताचे गुलामीचे शिक्षण

आपल्याला स्वतंत्र होऊन ७१  वर्षे झाली पण तरीही आपण पाहिजे तेवढा बदल आपण आपल्या  देशामध्ये आणु  शकलो नाही .मला खूप कळत म्हणून मी बोलतेय अशातला भाग नाही पण एक जागरूक नागरिक म्हणून आजूबाजूला बघते तेव्हा जे जाणवत तेच लिहण्याचा प्रयत्न माझ्या लेखणीतून करतेय. शिक्षण हा पाया आपल्या देशाला मजबूत करतो असा आपण नेहमीच म्हणतो आणि हे २०० वर्षांपासून चालू आहे पण तरीही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपली मानसिकता अजूनही बदलली नाही. आणि ती बदलावी अस कोणालाही वाटत नाही . आपली शिक्षण प्रणाली हे गुरुकुल प्रकारात मोडत होती. मुलांवर कुठल्याही प्रकारचं भार न देता त्यांना विविध विषयामध्ये पारंगत केलं जायचं . ते धनुर्विद्या असो किंवा मानस शास्त्र असो . जी विद्या एका विद्यार्थ्याला फक्त व्यवहारातच नाही तर स्वतःसाठी आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी उपयोगी येत असे. आता शत्रूंपासून बचाव करणे हा पर्याय राहिला नाही पण स्वतःला संकटकाळी सांभाळून ठेवणे हे समस्या उदभवली आहे.आताची शिक्षण प्रणाली फक्त पैसे कमावण्याचे विविध दार मोकळे करून देऊ शकते पण त्यातून जो पराभव वाट्याला येतो ते पचवण्याची क्षमता हे शिक्षण देत नाही .   इन्स्टंट मनी हा भयंकर रोग सध्या च्या पिढीला जखडून ठेवतोय ,मेहनत करण्याची तयारी नाही ,आलेला पराभव स्वीकारण्याची तयारी नाही, नात्यांना न्याय देता येत नाही. सगळीकडे फक्त नफा तोटा या दृष्टीतून बघण्याची सवय,सकस आहार न घेणं  हे खूप हानिकारक प्रकार या पिढीसोबत होत आहेत. ह्या सगळ्यांना पालकांची मानसिकता सोबतच  आताची शिक्षण प्रणाली जबाबदार आहे . हे  इतके वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर जाणवलं . भारतीय संस्कृतीचे महत्व हे सगळ्यात आधी त्यापासून दूर राहण्याऱ्या लोकांना पटले पण आपण मात्र त्याचा वसा  डोक्यावर वाहूनही त्याला किंमत द्यायला शिकलो नाही. नालंदा आणि तक्षशीला हे भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट होती. पण ते आता लोप पावत चाललय . अंध  होऊन अनुकरण करण्यात आपण भारतीय मग्न आहोत. बोलायला बराच काही आहे पण माझा परत बोट शिक्षणप्रणालीकडेच जातो. 


         मी आतापर्यंत जे शिक्षण घेतले किंवा जे शिक्षण आताच्या भावी अभियंतांना देते त्यावरून आपण काहीतरी या भारताच्या भविष्यात हातभार लावतोय असे  वाटतच नाही. फक्त पैसे ह्या दृष्टीतून ह्याकडे बघणं मला रुचत नाही. फक्त मार्क्स आणि  स्पर्धा त्यासाठी वाटेल ते करायची मुलांची मानसिकता एवढच गणित शिल्लक राहिलाय. मला ह्या दृष्ट चक्रातून बाहेर पडणं आता शक्य नाही . म्हणून सक्षमच्या (माझा मुलगा) शिक्षणाबाबत मी अजून जागरूक झाले. "शिवाजी १० मार्कला येणार "हा विषय मुलांच्या मनात येतो याला कोणाला जबाबदार ठरवणार???त्याला इतिहास शिकवावं पण कस ?हा प्रश्न मला पडतो ??मार्कांसाठी नाही सिंहगडावर नेऊन त्याला शिवाजींबद्दल सांगावं,जे पुरावे आता उपलब्ध आहे त्यावरून त्याला इतिहास शिकवावा . म्हणून आम्ही खूप फिरतो. त्याला जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर माझ्याकडे नसत पण आम्ही दोघे मिळून शोधतो . नो टेस्ट्स नो  exams फक्त इतिहासाची  मज्जा. माझ्या मुलाची क्षमता ठरवणारे मार्क्स नाही ,त्याला मॉनिटर करणारे शिक्षक नाही . ठराविक पाठ्यक्रम नाही. नो लिमिट्स .... आणि असेच बरेच पालकांना वाटत म्हणून homeschholers चा आकडा  दिवेसंदिवस वाढतोय . या शिक्षण प्रणालीमध्ये vision आणि मिशन हे जुळून आलेलं दिसत नाही. म्हणून ७१ वर्षानंतर हि आपण खर्च प्रगती केली का???हा प्रश्न मला कायम भेडसावतो 

Monday 10 July 2017

अवघड पण समाधान देणारा एका आईचा निर्णय

"सक्षमला शाळेत न पाठवणं "हा आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा विचार करून आणि दोघांनी एक मतांनी घेतलेला निर्णय आहे. आमच्या दृष्टीने तो तितकाच सहज असला तरी इतर लोक "काहीतरीच काय ??"म्हणून आम्हाला विचारत असतात . मुलाला शाळेत पहिल्यांदा पाठवायचंय  म्हणजे आई लोकांची जबरदस्त कसरत असते.  कुठल्या शाळेत टाकायचं ??ह्या पहिल्या प्रश्नापासून सुरवात होते. आपल्या मित्र मंडळीत शोभेल आणि जास्तीत जास्त स्टडी ओरिएंटेड हाय स्टेटस स्कूल,वेल सेटल ,फ्रेंडली इन्व्हॉर्नमेंट ,भरपूर ऍक्टिव्हिटी जिथे हे सगळं उपलब्ध असेल त्या शाळेमध्ये त्या २.५ ते ३ वर्षाच्या गोंडस चिमुकला/ली ची ऍडमिशन केली जाते . आणि ही प्रक्रिया मुलगा किंवा मुलगी जन्मल्यापासूनच सुरु होते. ह्यामागे स्कूल हा बिझनेस म्हणून उघडणाऱ्या लोकांचाच हात आहे

                                        
 हे बॅनर बघून सगळे पालक दिवसरात्र रांगे  मध्ये उभे असतात . मला शाळेत पाठ्वण्याला अजिबात विरोध नाही पण आजकाल शाळेच्या नावाखाली जे चालतंय त्याचा मला विरोध आहे . माझ्या स्वतःकडे शिक्षणातली उच्च  डिग्री असूनही मी हा निर्णय घेतलाय ह्याच लोकांना जास्त आश्चर्य वाटत . ते बरोबरही आहे मी हे सगळं जवळून पाहिलंय म्हणूनच त्या शिक्षण प्रणालीचा एक भाग असूनही मी माझ्या मुलाला शाळेत पाठवणार नाही. त्याच बालपण तिथे कोमेजून जात . कुठलीही एक गोष्ट दिल्या गेलेल्या साच्यातच झाली पाहिजे असा तिथल्या शिक्षकांचा आणि घरी येऊन पालकांचा हेका असतो . चौकटीबाहेर त्या मुलाला जर करायचं असेल तर त्याला स्वतंत्र नाही .स्वतःच्या मातृभाषेत बोलायचं नाही . इंग्लिशच बोलायला पाहिजे ,आजच्या युगातील बेस्ट कम्म्युनिकेशन  माध्यम आहे अस पालकांना वाटत . माझ्या मुलाला ग्लोबल व्हायला पाहिजे हा त्यांचा रेटा असतो . ग्लोबल ह्याची व्याख्या एका जापनीज माणसाला विचारली असता त्याने सुंदर शब्दात मांडली आहे  आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळ  नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णू दृष्टीने समजावून घेणे म्हणजे ग्लोबल ...... त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही  पण अनुकरणाचा नाही तर समजावून घेण्यासाठी .जर तुम्हाला  स्वतःच्या मातृभाषेतील साहित्यच जर नीट वाचता येत नसेल  तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजावून घेणार???आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल  कसे होणार ??????? म्हणून भारतीय पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात . इयत्ता ५  मधील एका विद्यार्थाला सिंहगड बद्दल १० ओळी
 लिहायला सांगितल्या त्याने इंग्रजीमध्ये लिहल्या .( मातृभाषा मराठी पण शिक्षण मात्र इंग्रजी माध्यम) हा विद्यार्थी आधी विचार मराठी मध्ये करतो आणि नंतर इंग्रजी मध्ये भाषांतर करून लिहतो ,लिहताना त्याला शब्दांची कमतरताही जाणवते पण याउलट ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचं माध्यम एकच आहे तो जे विचार करतो तेच कागदावर उतरवतो त्यामुळे त्याला एक जिवंतपणा येतो. आणि समजून लिहता येत. पण मातृभाषेत शिक्षण घेणं हे पालकांना रुचत नाही .त्यांच्या स्टेटस मध्ये बसत नाही .... आपल्या अपेक्षांचं ओझं आपण मुलांवर लादतो तू असाच केलं पाहिजे ..... तरच तुला चांगली नोकरी मिळेल ..... हे त्याच्या मनावर बिंबवलं असत. सगळे पालक असे नसतीलही पण पीयर प्रेशर असतंच.... 
फक्त पैसे आणि उच्च जीवनशैली मिळेल  हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण दिल्या जात किती चुकीचेआहे  हे!!!!! हे ध्येय समोर ठेऊन तो फक्त आयुष्यभर एम्प्लॉई म्हणूनच काम करू शकेल स्वतःचा उद्योग चालू करून दुसर्यांना एम्प्लॉई ठेवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला चौकटीबाहेर जावच लागत ... 




असे असंख्य उदाहरण बघून ,त्यांना भेटून ,चौकटीबाहेर पडून ,लोकांना न जुमानता आम्ही हा निर्णय घेतला. आणि "होम स्कूलर्स " हा ग्रुप पुण्यामध्ये जॉईन केला. तेव्हा असे वाटले फक्त आपणच असा विचार करत नाही आपल्यासोबत असे अनेक पालक आहे ज्यांना असच वाटत..आपला मुलगा स्कूल मध्ये जाऊन जे करतोय त्यापेक्षा तो "गूगल  युनिव्हर्सिटी  "मधून जास्त चांगला शिकतोय तेही स्वतःच स्वतः ..... खरच  प्रशंसनीय आहे . एक उदाहरण द्यायचं झालं तर या ग्रुप मध्ये माझ्यासारखीच एक आई मला भेटली ,ती एक उत्तम चित्रकार आहे सुंदर पैंटिंग्स तिने बनवलेले आहे ,तिचा मुलगा वय वर्ष १४ त्याने तिच्या पैंटिंग्सला   भारतातच नाही तर विदेशात सुद्धा एक उत्तम व्यापारीकरण उपलब्ध करून दिल गूगल हे माध्यम वापरून  जे एका एम बी ए मार्केटिंग वाल्याला सुद्धा जमल नसत.... म्हणून सक्षमला घरी शिकवण्याचा निर्णय घेतला .आम्ही दोघेही घरी शिकतो .. आणि शिकताना मज्जा करतो ... ते रेसिपी असेल,सायन्स असेल , भूगोल असेल , आर्ट अँड क्राफ्ट असेल , डान्स असेल म्युझिक असेल ...... बरच काही आणि आईच आपली शिक्षक आहे हे तर त्याच्या साठी खूप आनंदाची गोष्ट आहे .आणि त्याचे मित्र हे त्याच्या वयोगटातील तर आहेच पण सेक्युरिटी वाले काकाही त्याचे मित्र आहेत मित्र बनवण्यासाठी त्याला बंधन नाही .  मी होम स्कूल मध्ये जातो आणि माझी टीचर आई आहे असा तो सगळ्यांना सांगतो.... 

Monday 29 May 2017

उत्स्फूर्त जगायला शिका ……….


सगळ्या ताणतणावात उत्स्फूर्तता जिवंत ठेवण हा एकट पडण्यापासून टाळण्यासाठी ,निराशा दूर ठेवण्यासाठी फार महत्वाचा उपाय आहे अगदि छोट्या  छोट्या गोष्टी पण आपण खूप आखीव रेखीव चौकटी प्रमाणे करायला जातो आणि त्याची सहजताच गमावतो आपण उच्च पदावर काम करतो म्हणजे मोठ्याने हसता येत नाही ,गाण गुणगुणता येत नाही रस्त्यावर उभ राहून शेगदाणे तोंडात टाकता येत नाही jokes मारून हसता  येत नाही हे कोणी ठरवलं?तुम्ही आम्हीच न ?मग आपणच शिकायला हव ह्या सगळ्यातून बाहेर पडायला..... काय म्हणता?काही गोष्टी जर सहज घडत असतील तर त्या इतक्या सहज घडल्याचं कशा ?हा प्रश्न समोर उभा राहतो.आपण आपला आनंद हा कृत्रिम गोष्टींमध्ये जास्त शोधतो. ज्या झकपक दिसतात आणि पैसे खर्च करून मिळतात. प्रत्येक वीकएंड कुठे घालवायचा ह्याचे नियोजन आधीच सुरु होते . मग कुठेतरी दुसऱ्याच ऐकून  sight seeing ला जातो आणि काहीतरी थातुर मातुर बघून वेळ आणि पैसा खर्च करून येतो ,आणि आजकाल मॉलचे फॅड खूपच वाढले आहे तिथला कृत्रिमपणाचं प्रदर्शन पाहून कंटाळा यायला लागतो .रोज काय घेणार तिथून?पण तिथल्या झकाकी वर आपण मोहून जातो .याउलट नैसर्गिग गोष्टींचा शोध आपण घेऊ शकत नाही ज्या सहज मिळतात त्या गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही .सुंदर वाऱ्याची झुळूक,मोगऱ्याच्या फुलांचा सुंगंध,एखादी आवडती गाण्याची धून , मित्रांसोबत मारलेल्या गप्पा,भावंडांसोबत घालवलेल्या सुट्या,दुपारी हात पाय पसरून काढलेली झोप,ह्या सहज मिळणाऱ्या गोष्टी महाग झाल्या आहेत.  

आयुष्य सगळं कृत्रिमतेणे व्यापलंय ,कुणाकडेही जायचं म्हटलं तरी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सहज साधं सोपं अस काही राहीलच नाही . तुमचे कपडे सुद्धा तुम्हाला तुमच्या स्टेटस ला साजेसेच घालावे लागतात , तुम्हाला बोलताना सुद्धा उधार आणलेली इंग्रजी भाषाच वापरावी लागते ,ज्यानी समोरच्यावर छाप पडेल .एखाद्या संथ नदीला बघितलं तर दुरून त्याच्या गहिरेपणाची अनुभूती येणार नाही पण त्यामध्ये पाय टाकल्यावर लक्षात येईल नदीची खोली खूप आहे. आणि खळखळ आवाज करून वाहणाऱ्या नदीला बघितलं तर दुरून वाटेल नदी खूप खोल आहे पण मुळात खोली नसून तो फक्त खळखळाट असतो. असच असत आपलाही  जो जास्त प्रदर्शन करायला जातो मुळात तिथे काहीच नसतं ,तो फक्त कृत्रिम दिखावा असतो. आपण   आपल्या मध्ये कधी झाकूनच पाहत नाही लोकांचं बघून,लोकांसाठी जगतो. माणसाची सादगी ,साधेपणा त्याच्या अंतरंगाची ओळख करून देऊ  शकते . शेवटी खोटा मुखवटा किती दिवस टिकणार?तो कधीनाकधी फाटणारच पण जे शाश्वत आहे ते कायमस्वरूपी राहील त्याला प्रदर्शनाची गरज नसते . 

Wednesday 17 May 2017

मी आणि स्वयंपाकघर .....


 बाईचे  आणि स्वयंपाकघराचे नाते  हे  कितीतरी प्रकारचे असू शकतात, कोणाचं नातं हे कामापुरते असेल ,कुणाचे  सुट्टीच्या दिवसांपुरते मर्यादित ,कुणाचे रोजचे जिवाभावाचे घट्ट ..... माझं नातं तिसऱ्या प्रकारात मोडतं . मुळातच "खावे तर चवीने ,जगावे तर मानाने "ह्या वळणावर सरळ चालणारी मी . सकाळच्या चहाचा  स्वादसुद्धा कसा दरवळला पाहिजे आणि त्याच्या वाफेसोबत आपला  दिवसही प्रसन्न असायला पाहिजे . जोडीला गरम गरम   पोहे ,त्यावर खुलून दिसणारी हिरवी कोथिंबीर आणि बाजूला डोकावणारी लिंबूची फोड जेव्हा समोर येते तेव्हा सुटणारे पोट ,सुरु असलेले डाएटिंग ,ह्याचा विसर पडतो. हे   समीकरण म्हणजे लग्ग्न जुळवून आणि नंतर टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. मुलगी पसंत नव्हती पण पोहे आणि चहा ह्याच्या चवीला बघून हो म्हणालो बर का!!त्यावरून तू उत्तम गृहिणी पण असशील हे ओळखलं म्हणून लग्ग्न केलं ..... इति नखरे असलेले आमचे नवरे . मुळातच मला हॉटेल मध्ये जाऊन किंवा मागवून जेवणे हे पटत नाही. तिथली बाहेरची चकाकी सोडली तर आतमधली चकाकीवर न बोललेले बरे शिवाय पैसे फेकून मागवले अन्न हे कुठल्या भावनेने बनवले असणार ? पण आम्ही मात्र आमचं स्टेटस सिम्बॉल जपून ठेव ण्यासाठी महागड्या हॉटेल मध्ये जातोच ,तिथलं टोमॅटो सूप ओरपून , ... आईच्या हातची चव नाही बाबा अस म्हणत वीकएंड साजरा करतो. कशी असणार ??पदर खोचून ,सकाळपासून राबून ,प्रेमाने ,आनंदाने बनवलेले साधे वरण ,भात ,भाजी ,पोळीचे जेवण सुद्धा भुकेच्या वेळेच्या आधीच समोर  येते त्याची किंमत नाही मोजता येणार ,हॉटेलच्या जेवणाची सर देखील नाही येणार . घरी आलेला पाहुणा तोही माहेरचा असेल तर मग विचारायलाच नको (खरं असेलही कदाचित .... नवऱ्याची टिपणी )स्वयंपाकघरातुन येणारे आवाज ,सुगंध हे रोजच्यापेक्षा वेगळे येतात . आणि आलेला पाहुणा हा खाण्यासाठीच आलेला होता अस वाटायला लागत कारण आहेच तस ..... वरणाची फोडणी हि जादाची हिंग,कढीपत्ता ,कोकम आमसूल घालून केलेली असते, चवीला रोजची कोशिंबीर  असतेच पण सोबत तीन रंगाच्या वेगवेगळ्या चटन्या हि  असतात , लोणच्याची जुनी भरणी निघाली असते त्याबरोबरच काजू पेरलेला शिरा ,तूप मोकळ्या हाताने सोडलेली गरम पोळी, मऊ भात ,आंब्याच्या रसाची वाटी चारोळी घालून सजवली असते. दुपारचा खमंग चिवडा ,भेळ ,    आ इसक्रीम ,संध्याकाळी चायनीज ,साऊथ  इंडियन .... घर बसल्या हॉटेल चे मेनू मिळतात ... जीवन फक्त खाण्यासाठीच आहे ... आणि ते खरंच सुंदर आहे. हा आभास होतो . 
नवीन लग्न होऊन घरी आली तेव्हा आपल्याला स्वयंपाकघराचा ताबा मिळणारच नाही अस वाटत होते कारण एक सुगरण हात तिथे असतांना माझे काम फक्त भाजी वाणवणे ,कणिक मळणे ,पाणी भरणे एवढेच होते पण हळू हळू तो सुगरणपणाचा वारसा सुनेकडे सोपवून त्या निवृत्त कधी झाल्या हे कळलेच नाही . पण मला अजूनही त्यांची नजर इकडेच आहे अस वाटत म्हणून कि काय स्वयंपाक अजून रुचकर होतो. रेसिपी वाचून आपल्याला मीठ ,तेल टाकता येऊ शकत पण साखरेचा दोन तारी आणि गुळाचा एक तरी पाक ओळखायला ,भाजी करपायचा वास ओळखायला अनुभवाचे बोल लागतात . आमच्या दोघींच्या भांड्याचा आवाज हा कधी वाढलाच नाही. तो कायम एकमेकांना सांभाळत येत आहे ... त्यामुळे पदार्थांचे  दरवाळणारे सुगंध हे अजूनही  येत राहतात .तसेच भाजिला जास्त झालेलं तिखट ,कमी पडलेलं मीठ हे कधीही आमची चव घालवत नाही . 

   Mom's kitchen open for 24 hours 
Image result for  kitchen watches

Tuesday 2 May 2017

एक आगळा वेगळा वाढदिवस

आम्ही दोघही मुलाचा वाढदिवस  कसा grant करता येईल याचं  नियोजन करत होतो . पंच तारांकित हॉटेल्स  याची यादी काढायला  सुरवात केली ,त्यानंतर  मेनु काय काय असावे ?मित्र  ,आप्त  मंडळी ,नातेवाईक मुलाचे मित्र अशी भली मोठी यादी तयार झाली . जवळपास एक महिना अगोदर हा वाढदिवस special  कसा करायचा याचेच विचार मनात चालू होते. हातात खेळणा रा पैसा ,मित्रांमध्ये दाखवता यावी अशी श्रीमंती आणि मुलाच कौतुक या सगळ्यांचे  खूप मोठे नियोजन करण्यामध्ये आमचा वेळ जाऊ लागला . ज्याच्यासाठी  हे  नियोजन चालल होत तो मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ  होता फक्त आपले आई बाबा आपल्याला वेळ देत नाही म्हणून त्याची चिडचिड चालली होती . माझा मुलगा सक्षम वय वर्ष २. सगळ नियोजन एकदम  छान  झालाय म्हणून आम्ही दोघही शांत झोपलो . आमंत्रण पाठवून झाले. पण त्या दिवशी कॉलेजला  अचानक लवकर सुटटी मिळाली .लवकर घरी जावं आणि राहिलेली तयारी पूर्ण करावी या विचारात गाडीचा वेग वाढवला ,पण गाडीचा चक्का जॅम ..... हुश्श !!!आता एक तास त्यामध्ये जाणार होता गाडी दुकानदाराकडे सोपवून वेळ कोठे घालवावा असा विचार करत होते. रस्त्यामध्ये मातोश्री  अनाथाश्रम आणि वृद्धश्रम मला रोज जाता येता दिसायचे पण जायचं धाडस कधी झालं नाही...

Image result for matoshri vrudhashram pune

आज गाडी बंद पडण्याचं निमित्त मिळालं . मी फक्त आतमध्ये डोकावून बघावं म्हणून कोणालाही दिसणार नाही अशा आडोशाला उभे होते साधारण  वयोगट ३ वर्षांपासून पुढील वयाची मुले आणि मुली असतील . आई बाबा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती गरीब म्हणून काही शिक्षण मिळतंय म्हणून तिथे आली असावी . कुढलाही दुःख ना कुर्वाळता ते मुले स्वच्छंद बागडत होती . हसत होती खेळत होती , मनात विचार आला ह्यांचा  वाढदिवस ठाऊक असेल का कोणाला?आपण उच्च सोसायटीतील लोक म्हणून आपल्याला पैसा खर्च करायचा आहे ,श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून हे सगळं जमतंय . त्यांना ज्या दिवशी चांगलं जेवायला मिळेल ,चांगले कपडे घालायला मिळतील हेच त्यांचं सेलिब्रेशन .... हे लहान मुले ह्या जगाच्या डावपेचांपासून खूप दूर आहे माझा सक्षम काय किंवा हे लहान मुले काय.... गरीब ,श्रीमंत ,हा भाव अजून त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. आपल्याला खेळण्याचं स्वातंत्र्य आहे दोन वेळेस जेवायला मिळतंय हे त्यांच्यासाठी खूप आहे!!!
तेव्हाच ठरवलं आपण सेलेब्रेशन तर नेहमीच करतो .... दोन शब्द कौतुक करून लोक निघून जातील.... पण तो आनंद फक्त क्षणभर असेल.. आपण सक्षमचा वाढदिवस ह्या मुलांबरोबर साजरा करूया... अस मनाशी पक्क करून निघाले. ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना venue बदल झाल्याचा फोन केला आणि सगळ्यांना मातोश्रीला या म्हणून सांगीतले . बरेच लोक venue ऐकून आलेच नाही काही प्रेमापोटी आली काही चांगलं वाटणार नाही म्हणून हजेरी लावायला आली .... पण लोकांचा विचार बाजूला ठेवला तर सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ते सक्षमने त्याला त्याच्या वयाचे मुले दिसले जे नेहमी दिसणारे नव्हते ... त्यांचे खेळ ,त्यांचे बोलणे उगाच इंग्लिशचा आव आणणारे नव्हते . तिथे संध्याकाळी जमणाऱ्या आजी आजोबांसोबत गप्पा मारल्या आणि सगळ्यांसोबत "वदनी कवळ घेता " म्हणता म्हणता तो घास अधिकच गोड  वाटू लागला . हे मात्र नक्की उल्लेखनीय आहे तिथे आमंत्रित लोकांच्या बच्चे कंपनीने मात्र खरंच एन्जॉय केलं.. आणि आम्हाला मिळालं समाधान एक वेगळा वाढदिवस साजरा  केल्याचा  .... 
Image result for matoshri vrudhashram puneImage result for matoshri vrudhashram pune


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...