माणसाचं काय आयुष्य असतं??
ना जन्म स्वतःच्या हातात आहे ना मरण
कसा हा प्रकृतीचा अजब गजब नियम
चालता फिरता, प्रवासाचं अचानक थांबणं
काल नवीन कपड्यात बघितलेल्या व्यक्तीला
आज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नेणं
चार लोक उचलून नेतात त्या अबोल देहास
रडण्याचे, हुंद्क्याचे आवाज चिरती आसमंतास
थोडी दूरपर्यंत सोबत हि लोकांच्या गर्दीची
पुढच्या प्रवासाची वाट मलाच माझी ठरवायची
लाकडावर ठेवलेल्या शरीराला सोबत न मिळे कुणाची
घर ,दार ,नाते,पैसा सगळे जिवंतपणाचे खेळ हे
आज यातले काहीच सोबत नाही घेता आले
देहाला जळताना पाहून शांत सगळे उभे राहिले
आज मध्ये अडवायला सुद्धा कोणीच नाही आले
आज खरं जीवनाचे दर्शन मला झाले
आयष्याच्या गणिताचा अंत हा शून्यातच झाला
बेरीज वजाबाकी करून जीव हा पुरता थकला
उभ्या जीवनात बहराला माझ्या जरी निशिगंध
तरी शेवटी ललाटी लिहलेला असा हा अंत
काय म्हणावे याला हा शेवट कि आहे आरंभ
ज्या देहाच्या मागे धावलो तोच नश्वर होता
मला एक दिवस नेणारा मृत्यू हाच शाश्वत होता
आत्म तत्व सोडून देहाला सत्य समजणारा माझा मूर्खपणा होता !!
No comments:
Post a Comment